शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा, लुटमार व चिटफंडसारख्या अवैध कंपन्यांवर कारवाई करावी

By admin | Updated: November 19, 2015 01:26 IST

चंद्रपूर येथे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक जेव्हापासून रुजू झालेत तेव्हापासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खून, चोऱ्या, व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे.

चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची मागणी : जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन चंद्रपूर : चंद्रपूर येथे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक जेव्हापासून रुजू झालेत तेव्हापासून शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खून, चोऱ्या, व लुटमारीचे प्रमाण वाढले आहे. या घटनांवर वेळीच आळा घालून चिटफंडसारख्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे निवेदनातून केली आहे. दुचाकी वाहनावर स्वार महिलांचे मंगळसुत्र व चेन लुटणारे वडगाव प्रभाग तसेच साईबाबा वार्ड, स्नेहनगर, हवेली गार्डन या ठिकाणी वावर आहग. मागील महिन्यात सात ते आठ ठिकाणी घरफोड्या झाल्यात आणि स्टेडियम रोडला दुचाकीस्वारांनी तीन महिलांचे मंगळसुत्र ओढून नेले आणि राष्ट्रवादी नगर, तुलसीनगर येथील रहिवासी नारायण भानारकर व पुंडलिक कुंभारे यांच्या येथे दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज पळविला. त्यांच्या येथे दरोड्यांचा खेळ तब्बल पाऊण तास चालला. पोलिसांना फोन करुनही तब्बल एक तासापर्यंत कोणीच घटनास्थळी आले नाही. जर पोलीस प्रशासन सर्तक असते तर हे दरोडेखोर आपल्या जाळ्यात अडकले असते. यानंतर असे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने सर्तक रहावे व पोलीस गस्त वाढविण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.शहरातील वाहतुक नियंत्रण शाखेकडून सध्या चंद्रपूर शहरातील वाहतूक सुरळीत होत नाही आहे. त्यामुळे शहरामध्ये जागोजागी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील वाहतुक सुरळीत व्हावी अशी सूचना वाहतूक नियंत्रण शाखेला देण्यात यावी व जागोजागी रस्त्यावर होणारे अतिक्रमण थांबविण्यात यावे, असेही म्हटले आहे.चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे चंद्रपूर शहरामध्ये जवळजवळ ३० कंपन्यामार्फत सर्वसामान्य जनतेकडून १०० कोटी चिट फंडच्या नावावरती पैसा गोळा करीत असल्याची तक्रार दिली होती. परंतु अजूनही त्या कंपन्यांवर निर्बंध टाकण्यात आलेले नाही व कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची लुट अजूनही सुरू आहे. त्यामुळे चिटफंड कंपन्यांवर गुन्हे नोंद करुन कारवाई करण्यात यावी तसेच तस्करांना सहकार्य करणाऱ्या खनिकर्म अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीचे नंदु नागरकर, सुनीता लोढीया, विनायक बांगडे, सुभाषसिंह गौर यांनी निवेदनातून केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)