शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

मुख्यालयी न राहणाऱ्या वीज अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: October 14, 2015 01:33 IST

ग्राहकांना सेवा देणे आपले कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर करून मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी,

चंद्रपूर : ग्राहकांना सेवा देणे आपले कर्तव्य आहे. कर्तव्यात कसूर करून मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महावितरण, महापारेषणबाबत आयोजित आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, महापौर राखी कंचर्लावार, आ. शोभाताई फडणवीस, आ. नाना शामकुळे, आ. डॉ. देवराव होळी, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, आमदार बाळू धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, पंचायत समितींचे सभापती, महावितरणचे सर्व वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिसेंबर २०१५ पर्यंत सर्व थकबाकी वसूली करा, मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर प्रलंबित घरगुती, औद्योगिक व कृषी पंपाबाबत तातडीने कार्यवाही करून वीज उपलब्ध करून द्या, डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत महावितरणमधून निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी तयार करून कौशल्य विकासावर आधारीत प्रशिक्षण देऊन त्या जागी आयटीआयच्या युवकांना संधी देण्यात यावी, अपघात झालेल्या ठिकाणी वीज निरीक्षकाने तातडीने जाऊन २४ तासात अहवाल सादर करावा तसेच अपघातग्रस्त कुटुंबाला शासनाची मदत उपलब्ध करून द्यावी, त्यावेळेस संबंधित क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना सोबत घ्यावे, महावितरणच्या खांबावर वीज जोडणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशिवाय अन्य कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस अनुमती देण्यात येऊ नये तसेच असे करावयास भाग पाडणाऱ्या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी, असे सांगितले.प्रत्येक उपअभियंत्याने संबंधित विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधीस महिन्याच्या शेवटी प्रगती अहवाल सादर करावा. तसेच ग्रामीण भागातील पंचायत समितीत होत असलेल्या सभापतींच्या मासिक बैठकीला उपस्थित राहावे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या ठिकाणी संबंधित लाईनमन, उपअभियंता, शाखा अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या नावासह संपर्क क्रमांकाचा दर्शनी भागात फलक लावावा, ग्रामपंचायतच्या ठिकाणी वीज देयक केंद्रस मान्यता देण्यात यावी, बेरोजगार अभियंत्यांना १५ लाख रुपयांपर्यंतचा परवाना देण्याबाबत त्यांच्यात जनजागृती करण्याच्या हेतूने मेळावे भरवावेत, त्यांच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे कार्य करावे, प्रत्येक तालुकास्तरावर रोहित्र भवनाची निर्मिती करावी आणि एका उपविभागामध्ये केवळ एकाच कंत्राटदाराला काम करण्याची परवानगी देऊन जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देऊन ग्राहक, शेतकऱ्यांना उत्तम सेवा द्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्यात.बैठकीत अर्थ व नियोजन तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आदींसह सर्व आमदारांनी सूचना मांडल्या. (स्थानिक प्रतिनिधी)