शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
3
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
4
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
5
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
6
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
7
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
8
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
9
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
10
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
11
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
12
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
13
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
14
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
15
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
16
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
17
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
18
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
19
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
20
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 

पीक कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:52 IST

शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाने बँकांच्या तिजोरीमध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला आहे. मात्र अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा बँकांवर कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत दिला.यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस.एन.झा यांच्यासह खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासाठी बँकांना निधी देण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकºयांना विनाविलंब सुलभतेने कर्ज मिळावे, यासाठी शासन पुढाकार घेत आहे. काही बँका या मोहिमेला गती देत नसल्याचे दिसून आले. अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल. बँकांना केंद्र व राज्य शासनाकडून निधी देण्यात आला. विविध योजनांचा निधी बँकांच्या खात्यात ठेवण्यात आला. शेतकºयांना पीक कर्ज दिले नाही, तर ही खाती बंद करून अन्य बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येईल, असेही ना. अहीर यांनी नमुद केले.खासगी व जिल्हा बँकांमध्ये समन्वय ठेवून कर्ज वाटप करावे. राष्ट्रीयीकृत बँकांनी या मोहिमेमध्ये अत्यल्प कर्ज वाटप केल्याने संबंधित अधिकाºयांना या बैठकीत धारेवर धरण्यात आले. अ‍ॅक्सिस बँक, अलाहाबाद बँक, बडोदा व सिंडिकेट बँकांनी अत्यल्प कर्ज वितरण केले. या बँकांनी कर्ज वितरणामध्ये गती आणावी, अशा सूचनाही यावेळी करण्यात आल्या. जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज वाटप करताना अडचणी पुढे आल्या. त्यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकºयांना अधिकाधिक लाभ देताना नियमांमध्ये शिथिलता आणावी. यातील त्रासदायक अटी बदलण्याची ग्वाही ना. अहीर यांनी दिली. यावेळी आमदार धोटे यांनी राजुरा मतदारसंघातील जिवती, कवठाळा व पाटण येथे शेतकºयांना बँकांचे अधिकारी सहकार्य करीत नाही, असा आरोप केला. अशा बँकांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, बँकेमध्ये जमा झालेल्या रकमा आणि यावर्षी शेतकºयांना देण्यात येणाºया कर्जाबाबत बँकांनी ताळमेळ बसवावा. शेतकºयांची कोणत्याही स्थितीत अडवणूक करू नका, अशी सूचनाही केली. जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एन. झा यांनी जिल्ह्यातील बँकेच्या कर्ज वाटप मोहिमेतील सहभागाची माहिती दिली. जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांनी तालुकानिहाय वाटप केलेल्या कर्जाची माहिती सादर केली. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण ६० हजार पात्र शेतकºयांना ३३७ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक ५५ टक्के वाटा उचलला आहे.