शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
3
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
4
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
5
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
6
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
7
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
8
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
9
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
10
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
11
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
12
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
13
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
14
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
15
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
16
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
17
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
18
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
19
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
20
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश

दीपालीच्या आरोपींवर कारवाई, आशाच्या पदरी निराशा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे हल्ली मुक्काम सास्ती ता. राजुरा यांची शेतजमीन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत करण्यात आली. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे तुळशिराम घटे यांचे कुटुंब. वेकोलीत शेतजमीन गेल्यामुळे भूमिहीन झालेले तुळशीराम घटे हे सास्ती येथे वास्तव्यास आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

ठळक मुद्देवडिलाने तक्रार करून वेकोलि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले : पोलिसांकडून मात्र हालचालीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तुळशीराम घटे यांची शेती पोवणी-३ या को‌ळसा खाणीत गेली. प्रकल्पग्रस्त असल्यामुळे आशाला नोकरी मिळावी, अशी त्यांची इच्छा. आशाने नोकरीसाठी प्रयत्न केले. वेकोली अधिकाऱ्यांकडे नोकरीसाठी कागदपत्रांसह चकरा मारायची. अशातच एक दिवस ती विष प्राशन करून आपली इहलोकाची यात्रा संपविते. असे काय घडले, ज्यामुळे आशाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली? अमरावतीच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आरोपींना अटक झाली. आशाच्या पदरी मात्र निराशा का? या प्रश्नाचे उत्तर पोलीस प्रशासन शोधून देईल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे. राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे हल्ली मुक्काम सास्ती ता. राजुरा यांची शेतजमीन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत करण्यात आली. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे तुळशिराम घटे यांचे कुटुंब. वेकोलीत शेतजमीन गेल्यामुळे भूमिहीन झालेले तुळशीराम घटे हे सास्ती येथे वास्तव्यास आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना शेती अधिग्रहणाचा मोबदला मिळाला.  त्यांचे वय जास्त असल्यामुळे आपल्या मुलीला आशाला नोकरी द्यावी, असे पत्र त्यांनी वेकोली व्यवस्थापनाला दिले. १९ वर्षीय आशा मोठ्या आशेने आता नोकरीसाठी प्रयत्न करू लागली. दरम्यान, लालफीतशाहीत तिला वाईट अनुभव आला. २२ मार्च रोजी ती वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिची प्रकृती बिघडली. २३ मार्च रोजी तिच्या स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. २७ मार्चला प्रकृती अधिक खालावल्याने तिला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान ३१ मार्च रोजी आशाची प्राणज्योत मालवली. आशाने विष घेतले असावे. त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे हे विष हळूहळू आपला प्रभाव दाखवत होते, अखेर यात तिचा बळी गेला. आशाचा मृत्यू विषामुळे झाला असला तरी ते तिने का घेतले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या घटनेनंतर नेहमीप्रमाणेच पोलीसही तक्रार घेण्यास टाळाटाळ करू लागले. याचाच अर्थ पोलीस आशाला न्याय देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आशाचा मृतदेह घेऊन वेकोली कार्यालय गाठले; मात्र अद्यापही आशाला न्याय मिळाला नाही. वेकोलीच्या अधिकाऱ्यांमुळे आशाचा बळी गेल्याचा आरोप आशाच्या वडिलाचा आहे; मात्र पोलीस यंत्रणा हे प्रकरण दडपण्याच्या मानसिकतेत सुरुवातीपासूनच असल्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कोण करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.२२ मार्चला काय घडले?२२ मार्च रोजी आशा घटे ही वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, तिच्यासोबत काय घडले, यामुळे आशाने टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध पोलीस का घेत नाही. पोलिसांचे हात वेकोलीने बांधले काय? हे प्रश्न खाकीवर संशय निर्माण करायला लावणारे आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस