शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
3
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
4
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
5
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
6
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
7
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
8
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
9
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
10
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
11
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
12
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
13
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
14
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
15
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
16
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
17
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
18
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
19
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
20
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी

दीपालीच्या आरोपींवर कारवाई, आशाच्या पदरी निराशा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 05:00 IST

राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे हल्ली मुक्काम सास्ती ता. राजुरा यांची शेतजमीन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत करण्यात आली. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे तुळशिराम घटे यांचे कुटुंब. वेकोलीत शेतजमीन गेल्यामुळे भूमिहीन झालेले तुळशीराम घटे हे सास्ती येथे वास्तव्यास आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

ठळक मुद्देवडिलाने तक्रार करून वेकोलि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले : पोलिसांकडून मात्र हालचालीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तुळशीराम घटे यांची शेती पोवणी-३ या को‌ळसा खाणीत गेली. प्रकल्पग्रस्त असल्यामुळे आशाला नोकरी मिळावी, अशी त्यांची इच्छा. आशाने नोकरीसाठी प्रयत्न केले. वेकोली अधिकाऱ्यांकडे नोकरीसाठी कागदपत्रांसह चकरा मारायची. अशातच एक दिवस ती विष प्राशन करून आपली इहलोकाची यात्रा संपविते. असे काय घडले, ज्यामुळे आशाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली? अमरावतीच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांच्या आरोपींना अटक झाली. आशाच्या पदरी मात्र निराशा का? या प्रश्नाचे उत्तर पोलीस प्रशासन शोधून देईल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे. राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे हल्ली मुक्काम सास्ती ता. राजुरा यांची शेतजमीन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत करण्यात आली. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे तुळशिराम घटे यांचे कुटुंब. वेकोलीत शेतजमीन गेल्यामुळे भूमिहीन झालेले तुळशीराम घटे हे सास्ती येथे वास्तव्यास आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना शेती अधिग्रहणाचा मोबदला मिळाला.  त्यांचे वय जास्त असल्यामुळे आपल्या मुलीला आशाला नोकरी द्यावी, असे पत्र त्यांनी वेकोली व्यवस्थापनाला दिले. १९ वर्षीय आशा मोठ्या आशेने आता नोकरीसाठी प्रयत्न करू लागली. दरम्यान, लालफीतशाहीत तिला वाईट अनुभव आला. २२ मार्च रोजी ती वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिची प्रकृती बिघडली. २३ मार्च रोजी तिच्या स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. २७ मार्चला प्रकृती अधिक खालावल्याने तिला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान ३१ मार्च रोजी आशाची प्राणज्योत मालवली. आशाने विष घेतले असावे. त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे हे विष हळूहळू आपला प्रभाव दाखवत होते, अखेर यात तिचा बळी गेला. आशाचा मृत्यू विषामुळे झाला असला तरी ते तिने का घेतले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या घटनेनंतर नेहमीप्रमाणेच पोलीसही तक्रार घेण्यास टाळाटाळ करू लागले. याचाच अर्थ पोलीस आशाला न्याय देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आशाचा मृतदेह घेऊन वेकोली कार्यालय गाठले; मात्र अद्यापही आशाला न्याय मिळाला नाही. वेकोलीच्या अधिकाऱ्यांमुळे आशाचा बळी गेल्याचा आरोप आशाच्या वडिलाचा आहे; मात्र पोलीस यंत्रणा हे प्रकरण दडपण्याच्या मानसिकतेत सुरुवातीपासूनच असल्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कोण करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.२२ मार्चला काय घडले?२२ मार्च रोजी आशा घटे ही वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, तिच्यासोबत काय घडले, यामुळे आशाने टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध पोलीस का घेत नाही. पोलिसांचे हात वेकोलीने बांधले काय? हे प्रश्न खाकीवर संशय निर्माण करायला लावणारे आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस