शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपुरात वर्षभरात ३६९४ वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST

बल्लारपूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो जड वाहनांची वर्दळ असते. शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेचे ...

बल्लारपूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारो जड वाहनांची वर्दळ असते. शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे वाहतूक शाखेचे कर्तव्य आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम मोडत असतात. मागील वर्षभरात बेशिस्त वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे, विनालायसन्स वाहन चालविणे, अवैध वाहतूक, हेल्मेट परिधान न करणे, अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे आदी नियमांचा भंग करणाऱ्या ३ हजार ६९४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८ लाख ५० हजार ७८० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांना नियम पाळण्याची समज देण्यात आली. वर्षभरात रस्त्यावर अडथळे निर्माण करणाऱ्या १६४ जणांना भादंविच्या कलम २८३ नुसार जणांवर कारवाई करून कोर्टात पाठविण्यात आले. भरधाव वाहन चालविणाऱ्या २० जणांना भादंविचे २७९ प्रमाणे कारवाई करून दंड आकारण्यात आला. मोटार वाहन कायदा १८५ प्रमाणे २५ जणांवर कारवाई करण्यात आली. याव्यतिरिक्त हयगयीने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करून वर्षभरात एकूण ३ हजार ६९४ जणांचे चालान फाडण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेच्या निलेश माळवे यांनी दिली.

कोट

सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असून, शहरात ठिकठिकाणी वाहतुकीबाबत फलक लावण्यात आलेले आहे. दुचाकीचालकांनी हेल्मेट घालूनच वाहन चालवावे. चारचाकीस्वारांनी सीटबेल्टचा वापर करावा. तसेच वाहतूक नियमांचे पालन करावे.

-उमेश पाटील, पोलीस निरीक्षक, बल्लारपूर