शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थ्यांसाठी अपघात योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 05:00 IST

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा दुदैवाने एखाद्यावेळी अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी खर्च येतो. हा खर्च भागविताना पालकांना अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी उपचाराचा आर्थिक भार संबंधित शाळेतील शिक्षकांनाही उचलावा लागतो.

ठळक मुद्दे९८ हजार विद्यार्थी : २० हजारांपर्यंत उपचारासाठी तरतूद

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इंग्रजी शाळांच्या तुलनेमध्ये आता जिल्हा परिषद शाळांनीही तयारी सुरू केली आहे. यासाठी विविध प्रयोगांचा अवलंब केला जात आहे. जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी कुठेही मागे पडू नये यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांच्यासह शिक्षण विभाग परिश्रम घेत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास उपचाराचा खर्च करताना पालकांना आर्थिक ताण पडू नये, यासाठी शिक्षण समितीने विद्यार्थ्यांसाठी अपघात सामुग्रह योजना सुरू केली आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून जिल्ह्यातील ९८ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा दुदैवाने एखाद्यावेळी अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी खर्च येतो. हा खर्च भागविताना पालकांना अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी उपचाराचा आर्थिक भार संबंधित शाळेतील शिक्षकांनाही उचलावा लागतो. पालक तसेच शिक्षकांना त्रास होऊ नये यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी अपघात सामुग्रह योजना सुरु केली आहे. यावर्षी पहिले वर्ष असल्याने जिल्हा परिषदेने २ लाख रुपयांची तरतुद केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना २० हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करण्यात येणार आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच चंद्रपूर जिल्हा परिषद राबविल्याचे बोलल्या जात आहे. या योजनेमुळे शिक्षकांसह शिक्षक संघटनांनीही समाधान व्यक्त केले आहे.२ लाखांची तरतूदअपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिक्षण समितीने प्रस्ताव मंजुर केला आहे. या योजनेचे चंद्रपूर जिल्हा परिषदेचे पहिलेच वर्ष असल्याने जिल्हा परिषदेतील निधीमधून २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पैशातून विद्यार्थ्यांना मदत करण्यात येणार आहे.या विद्यार्थ्यांना मिळणार मदतजिल्हा परिषदेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व शाळांतील विद्यार्थी. यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे.असा करावा लागणार अर्जएखाद्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या पालकांना प्रथम मुख्याध्यापकांना कळवावे लागणार आहे. मुख्याध्यापकांकडून चौकशी झाल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागामध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विचार करण्यात येणार आहे. अपघाताचे स्वरुप बघून विद्यार्थ्यांनी किती मदत करायची यासंदर्भात शिक्षण समिती ठरविणार आहे.विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास त्याचा उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी शिक्षण समितीने सुचविलेल्या विषयानुसार ही तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकारची तरतूद जिल्ह्यात पहिल्यांदाज करण्यात आली आहे.- दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, चंद्रपूरविद्यार्थ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी जिल्हा परिषदेने मदत करण्याची अनेक संघटना तसेच शिक्षकांची मागणी होती. या मागणीनुसार शिक्षण समितीमध्ये हा विषय ठेवण्यात आला आणि त्याला मंजुरी देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी मदत मिळणार आहे.- रेखा कारेकर,शिक्षण सभापती, जि. प. चंद्रपूर

टॅग्स :Accidentअपघात