शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
3
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
4
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
5
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
6
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
7
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
8
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
9
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
10
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
11
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
12
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
13
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
14
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
15
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
16
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
17
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
18
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
19
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
20
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा हाताळणी विभागात अपघात ; चंद्रपूर वीज केंद्रातील एक संच ठप्प, दुसरा आधीच बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 13:46 IST

३९ वर्षांनंतर तिसरा संच थांबला : गॅन्ट्री कोसळल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम?

चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांच्या संचात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री तांत्रिक कारणामुळे कोसळल्याची घटना शुक्रवारी (दि. २९) पहाटे दोन वाजता घडली. या अपघातामुळे तिसऱ्या संचातून सध्या वीजनिर्मिती बंद आह; तर चौथा संच आधीपासूनच वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे थांबलेला आहे, अशी माहिती महाऔष्णिक केंद्राने शुक्रवारी (दि. २९) दिली.

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र कार्यक्षमता उत्कृष्ट ठेवतानाच सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देत आहे; परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तीन आणि चौथ्या क्रमांकांच्या संचात कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री खाली पडण्याची घटना घडली.

ही घटना घडल्यानंतर महाऔष्णिक वीज केंद्राने दुरुस्तीसाठी पाऊल उचलले. हे काम लवकरच पूर्ण होऊन संच कार्यान्वित केले जातील, अशी माहिती केंद्राच्या उपमुख्य अभियंता (प्रशासन) विभागाने दिली.

चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राची एकूण स्थापित क्षमता २ हजार ९२० मेगावॉट असून, यामध्ये ५०० मेगावॉटचे पाच संच आणि २१० मेगावॉटचे दोन संच कार्यरत आहेत. तीन क्रमांकाचा संच १ एप्रिल १९८६, तर चौथा संच ४ नोव्हेंबर १९८६ रोजी कार्यान्वित करण्यात आला होता. गेली तब्बल ३९ वर्षे दोन्ही संचांतून अखंड वीजनिर्मिती सुरू होती.

 

टॅग्स :electricityवीज