शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2016 00:53 IST

सरपण गोळा करणे व इतर कामासाठी गेलेल्या महिला व पुरुषांवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटना सतत घडत आहेत.

वन्यप्राणी हल्ले वाढले : गावागावांत दवंडी व गस्तीत वाढमूल : सरपण गोळा करणे व इतर कामासाठी गेलेल्या महिला व पुरुषांवर वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यावर उपाय म्हणून वनविभागाने आता जंगलात प्रवेशबंदी लादण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गावागावांत दवंडी पिटली जात असून गस्तीतही वाढ करण्याचा प्रयत्न वनविभागाने चालविला आहे. चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे व उपवनसंरक्षक संरक्षक आर.टी. धाबेकर यांच्या आदेशानुसार मूल तालुक्यातील राजोली क्षेत्रात प्रेशबंदीचा प्रयत्न करुन मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनविभागाच्या अधिपत्याखाली असलेले वन दिवसेंदिवस कमी होत असल्याने तसेच जंगलातील वन्यप्राणी जे हिंस्र प्राण्यांना अन्न म्हणून हवे असते, ते दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात हिंस्र प्राणी वाघ, बिबट हे गावाशेजारी आश्रय घेत असल्याचे दिसून येत आहे. गावाशेजारी असलेल्या जंगलात सरपणासाठी असो की इतर कामासाठी महिला किंवा पुरुष गेला की दबा धरुन बसलेले हे वन्यप्राणी त्यांच्यावर हल्ला चढवितात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती अशाप्रकारे मृत्यू पावल्याने कुटुंबांवरही आभाळ कोसळते. हे टाळण्यासाठी वनविभागाने राखीव वनाशेजारी असलेल्या गावागावात प्रवेशबंदी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासंदर्भात सर्व ग्रामपंचायतींना प्रवेशबंदीचे पत्र राजोली परिक्षेत्रात देण्यात आले आहे. तसेच या अधिनस्त असलेल्या वनरक्षक व वनमजुरामार्फतीने गावात दवंडी देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे. जंगलात गस्तसुद्धा वाढविण्यात आली आहे. जंगलात ट्रॅप कॅमेरेसुद्धा वाढविण्यात आले असून जंगलात होणाऱ्या एकूण हालचालीवर करडी नजर वनविभागाने ठेवली आहे. वनविभागाने सर्व गावात हा उपक्रम राबविल्यास मानव-वन्यप्राणी संघर्ष टाळता येऊन अनुचित घटनांवर आळा बसेल. (तालुका प्रतिनिधी)