शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

धरणात मुबलक; मात्र शहरात टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:02 IST

चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्षे लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी शहरातील पाण्याची बोंब मात्र कमी झालेली नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वैतागले आहेत.

ठळक मुद्देअनेक वॉडांमध्ये अनियमित पाणीचंद्रपुरात पाण्याची कृत्रिम टंचाईटिल्लू पंपांमुळे समस्या वाढली

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात महानगरपालिका अस्तित्वात येऊन पाच वर्षे लोटली आहे. या पाच वर्षात शहरात अनेक सकारात्मक बदल झाले असले तरी शहरातील पाण्याची बोंब मात्र कमी झालेली नाही. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे मागील अनेक वर्षांपासून चंद्रपूरकर वैतागले आहेत. पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीचा मनमानी कारभार व महापालिकेचा दुर्लक्षितपणा, यासाठी कारणीभूत ठरत आहे. सध्या तप्त सूर्यकिरणे चंद्रपूरकरांना होरपळून टाकत आहे. चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात ८५ टक्के जलसाठा आहे. असे असतानाही शहरातील अनेक वार्डात कृत्रिम पाणीटंचाई केली जात आहे. धरणात साठा असतानाही नागरिकांना गरजेपुरते पाणीही मिळू नये, ही बाब संताप अनावर करणारी आहे.चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. सद्यस्थितीत चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणातही ४७.०८ टक्के जलसाठा आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बºयाच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले.पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. चंद्रपूरचा उन्हाळा कूपरिचित आहे. मात्र समाधानाची बाब अशी की एप्रिल महिन्यातही चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात ८५.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. चंद्रपूर वीज केंद्राने नियमित पाण्याचा उपसा केला तरी पावसाळा लागेपर्यंत चंद्रपूरकरांना मुबलक पाणी मिळू शकते. मात्र मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील अनेक वार्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. दादमहल वार्ड, भिवापूर, नेहरूनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, भानापेठ वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, वडगाव, बाबुपेठ परिसरातील अनेक वार्ड व तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे. दोन-दोन दिवस नळ येत नाही. आलाच तर कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धार मोठी नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे.शहराला हवे ४० दशलक्ष मीटर पाणीचंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात आहे. संपूर्ण शहराला दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला ९० ते १०० लिटर पाणी दररोज लागते. मात्र यापैकी ३० ते ३५ लिटरही पाणी दरडोई मिळत नाही.तक्रारी आल्या की टँकरने पुरवठाचंद्रपुरातील दादमहल वार्ड, भिवापूर, नेहरूनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, भानापेठ वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, वडगाव, बाबुपेठ परिसरातील अनेक वार्ड व तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. दोन-दोन दिवस पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात. पाण्याची सर्वत्र टंचाई जाणवत असतानाही मनपा याबाबत गंभीर नाही. नागरिकांची ओरड झालीच तर त्यांच्या वार्डात टँकर पाठविला जातो.भिकेचे पैसे दिले; तरीही पाणी नाहीयेथील विठ्ठल मंदिर वार्ड व बालाजी वार्ड तब्बल आठ दिवस नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा झाला नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी यंग चांदा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली भिक मांगो आंदोलन करीत मनपावर मोर्चा काढला. भिक मागून जमा झालेले पैसे मनपा प्रशासनाला देऊन ‘पैसे घ्या, पण पाणी द्या’ अशी मागणी करण्यात आली. मात्र यानंतरही सदर वार्डात अनियमितच पाणी पुरवठा सुरू आहे.पाईपलाईन तीच, कनेक्शन वाढलेपाण्याची टॉकी ते फिल्टर प्लॅन्टमध्ये असणारी पाईप लाईन मोठी असते. त्यानंतर मुख्य पाईप लाईनद्वारे हे पाणी संबंधित प्रभागात पोहचते. त्यानंतर ३ ते ४ इंचांच्या पाईपमधून हे पाणी वितरित केले जाते. पूर्वी ५० कनेक्शनधारकांना ज्या पाईनलाईनवरून पाणी वितरित केले जाते, त्याच पाईनलाईनवर आता १०० ते २०० कनेक्शन आहेत. त्यामुळे पाहिजे तसा पाणी पुरवठा होत नाही.उन्हाळ्यात धरणातील पाणी टिकावे, यासाठी मनपा प्रशासनाने एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. आता धरणात बऱ्यापैकी पाणी असल्याने नागरिकांनाही नळाद्वारे नियमित पाणी दिले जाईल. मनपाद्वारे अनेक ठिकाणी टाक्या ठेवल्या आहेत. त्याला चार-पाच नळ लावले आहेत. टँकरने यात पाणी टाकले जाते. काही तांत्रिक अडचणीमुळे काही वार्डात पाणी मिळाले नाही तर या टाकीमधून पाणी घेता येते. बालाजी वार्डातील पाईपलाईन खोदकामात दबली होती. ती आता पूर्ववत केली जात आहे.- अंजली घोटेकर, महापौर, महापालिका, चंद्रपूर.

टॅग्स :Waterपाणी