शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

काँग्रेसमध्ये एबीचा घोळ

By admin | Updated: February 3, 2017 01:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती.

चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती. काँग्रेसमध्य आपल्याच पक्षातील उमेदवारांविरूद्ध एबी फार्म दिल्याच्या चर्चेने आणि त्यावरील आक्षेपामुळे काँग्रेसच्या घरातील भांडणाची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू होती.गुरूवारी छानणीदरम्यान नकोडा-मार्डा आणि मूल तालुक्यातील राजोली या तीन ठिकाणी काँग्रेसच्या दोन उमेदवारांकडे वेगवेगळे एबी फॉर्म असल्याची बाब उघडकीस आली. यावरून नक्की पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हे ठरविताना अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. या घटनाक्रमानंतर संबंधित उमेदवारांनी आपल्या नेत्यांना ही बाब कळविली. त्यावर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून प्रदेश काँग्रेस कमेटीकडून स्विकृत झालेल्या उमेदावारांची यादीही सोबत जोडली. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून यासाठी आमदार विजय वडेट्टीवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेऊन उमेदवार ठरविले असताना अशा पद्धतीने पक्षातील उमेदवाराविरोधातच एबी फॉर्म देणे हा प्रकार दुर्देवी असल्याचे त्यांनी या पत्रातून म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रिगंणात १,०२७ उमेदवार गुरूवारी झालेल्या छानणीनंतर आता रिंगणात एक हजार २७ उमेदवार उरले आहेत. यात पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६२० तर, जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी भरलेले २३ नामांकन गळाले तर, पंचायत समितीसाठी भरलेले ५८ नामांकन छानणीत गळाले. अनेक उमेदवारांनी दक्षता घेवून दोन नामांकन भरले होते. आज छानणीदरम्यान ते गळाले. असे असले तरी काही ठिकाणी धोका झालाच. जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करणञयाची तारीख ५ फेब्रुवारी असून नवमवानकन परत घेण्याचा अखेरचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. त्यानंतरच रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या संदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता, पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षांकडे नाव लिहिलेले एबी फॉर्म दिले होते, असे ते म्हणाले. नकोडा-मार्डा येथील उमेदवाराकडे शौचालय नसल्याने नामांकन गळण्याची शक्यता होती. तर, राजोलीतील आमच्या पक्षाची उमेदवार भाजपाच्या संपर्कात असल्याने या दोन्ही जागा रिक्त राहण्याची शक्यता होती. तमुळे पक्षाचे नुकसान नको यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षाकडे एबी फॉर्म देवून ठेवला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.