शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये एबीचा घोळ

By admin | Updated: February 3, 2017 01:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती.

चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती. काँग्रेसमध्य आपल्याच पक्षातील उमेदवारांविरूद्ध एबी फार्म दिल्याच्या चर्चेने आणि त्यावरील आक्षेपामुळे काँग्रेसच्या घरातील भांडणाची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू होती.गुरूवारी छानणीदरम्यान नकोडा-मार्डा आणि मूल तालुक्यातील राजोली या तीन ठिकाणी काँग्रेसच्या दोन उमेदवारांकडे वेगवेगळे एबी फॉर्म असल्याची बाब उघडकीस आली. यावरून नक्की पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हे ठरविताना अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. या घटनाक्रमानंतर संबंधित उमेदवारांनी आपल्या नेत्यांना ही बाब कळविली. त्यावर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून प्रदेश काँग्रेस कमेटीकडून स्विकृत झालेल्या उमेदावारांची यादीही सोबत जोडली. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून यासाठी आमदार विजय वडेट्टीवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेऊन उमेदवार ठरविले असताना अशा पद्धतीने पक्षातील उमेदवाराविरोधातच एबी फॉर्म देणे हा प्रकार दुर्देवी असल्याचे त्यांनी या पत्रातून म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रिगंणात १,०२७ उमेदवार गुरूवारी झालेल्या छानणीनंतर आता रिंगणात एक हजार २७ उमेदवार उरले आहेत. यात पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६२० तर, जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी भरलेले २३ नामांकन गळाले तर, पंचायत समितीसाठी भरलेले ५८ नामांकन छानणीत गळाले. अनेक उमेदवारांनी दक्षता घेवून दोन नामांकन भरले होते. आज छानणीदरम्यान ते गळाले. असे असले तरी काही ठिकाणी धोका झालाच. जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करणञयाची तारीख ५ फेब्रुवारी असून नवमवानकन परत घेण्याचा अखेरचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. त्यानंतरच रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या संदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता, पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षांकडे नाव लिहिलेले एबी फॉर्म दिले होते, असे ते म्हणाले. नकोडा-मार्डा येथील उमेदवाराकडे शौचालय नसल्याने नामांकन गळण्याची शक्यता होती. तर, राजोलीतील आमच्या पक्षाची उमेदवार भाजपाच्या संपर्कात असल्याने या दोन्ही जागा रिक्त राहण्याची शक्यता होती. तमुळे पक्षाचे नुकसान नको यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षाकडे एबी फॉर्म देवून ठेवला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.