शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

काँग्रेसमध्ये एबीचा घोळ

By admin | Updated: February 3, 2017 01:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती.

चंद्रपूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवणुकीसाठी गुरूवारी छानणीची धांदल सुरू असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच धावपळ सुरू होती. काँग्रेसमध्य आपल्याच पक्षातील उमेदवारांविरूद्ध एबी फार्म दिल्याच्या चर्चेने आणि त्यावरील आक्षेपामुळे काँग्रेसच्या घरातील भांडणाची चर्चा तहसिल कार्यालयात सुरू होती.गुरूवारी छानणीदरम्यान नकोडा-मार्डा आणि मूल तालुक्यातील राजोली या तीन ठिकाणी काँग्रेसच्या दोन उमेदवारांकडे वेगवेगळे एबी फॉर्म असल्याची बाब उघडकीस आली. यावरून नक्की पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण हे ठरविताना अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. या घटनाक्रमानंतर संबंधित उमेदवारांनी आपल्या नेत्यांना ही बाब कळविली. त्यावर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मूलचे उपविभागीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून प्रदेश काँग्रेस कमेटीकडून स्विकृत झालेल्या उमेदावारांची यादीही सोबत जोडली. दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रार केली असून यासाठी आमदार विजय वडेट्टीवार आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेऊन उमेदवार ठरविले असताना अशा पद्धतीने पक्षातील उमेदवाराविरोधातच एबी फॉर्म देणे हा प्रकार दुर्देवी असल्याचे त्यांनी या पत्रातून म्हटले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रिगंणात १,०२७ उमेदवार गुरूवारी झालेल्या छानणीनंतर आता रिंगणात एक हजार २७ उमेदवार उरले आहेत. यात पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी ६२० तर, जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी भरलेले २३ नामांकन गळाले तर, पंचायत समितीसाठी भरलेले ५८ नामांकन छानणीत गळाले. अनेक उमेदवारांनी दक्षता घेवून दोन नामांकन भरले होते. आज छानणीदरम्यान ते गळाले. असे असले तरी काही ठिकाणी धोका झालाच. जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करणञयाची तारीख ५ फेब्रुवारी असून नवमवानकन परत घेण्याचा अखेरचा दिवस ७ फेब्रुवारी आहे. त्यानंतरच रिंगणातील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या संदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधला असता, पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षांकडे नाव लिहिलेले एबी फॉर्म दिले होते, असे ते म्हणाले. नकोडा-मार्डा येथील उमेदवाराकडे शौचालय नसल्याने नामांकन गळण्याची शक्यता होती. तर, राजोलीतील आमच्या पक्षाची उमेदवार भाजपाच्या संपर्कात असल्याने या दोन्ही जागा रिक्त राहण्याची शक्यता होती. तमुळे पक्षाचे नुकसान नको यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून तालुका अध्यक्षाकडे एबी फॉर्म देवून ठेवला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.