शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

बसस्थानकातील गर्दी वाढली चंद्रपूर : सोमवारपासून अनलाॅक करण्यात आले. त्यामुळे बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नात ...

बसस्थानकातील गर्दी वाढली

चंद्रपूर : सोमवारपासून अनलाॅक करण्यात आले. त्यामुळे बाहेर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. परिणामी एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून एसटीच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता पूर्ण क्षमतेने फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, नागपूर तसेच गडचिरोली येथे जाणाऱ्यांची संख्या अधिक असून या शहरांकडे महामंडळाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामीण भागातीलही बसफेऱ्या वाढल्या असून, बऱ्यापैकी प्रवासी मिळत आहेत.

पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर अंधार

चंद्रपूर : शहरातील नागपूर रोड, बल्लारपूर तसेच मूल रस्त्यावरील काही पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

जप्त वाहनांचा लिलाव करावा

चंद्रपूर : महसूल प्रशासनाने मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात रेती जप्त केली आहे. रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने संबंधित मालकांनी दंड न भरल्यामुळे प्रशासनाकडे आहेत. त्यामुळे सदर वाहनांचा लिलाव करण्याची मागणी केली जात आहे.

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील काही भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वीज विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी शहरातील पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा

चंद्रपूर : कोरोना काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, फ्रंट वर्करला विमा संरक्षण देण्यात आले आहे. मात्र, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणतीच सुविधा नाही. त्यातच विमासुद्धा लागू नाही. अशा वेळीही त्यांना विविध शासकीय कार्यालयात सेवा द्यावी लागत आहे. त्यामुळेे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही संरक्षण द्यावे, तसेच शासकीय सेवेत नियमित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

शासकीय कार्यालयांची नियमित स्वच्छता करा

चंद्रपूर : बहुतांश शासकीय कार्यालयात अस्वच्छता आहे. विशेषत: प्रशासकीय भवन परिसर सोडला तर इतर कार्यालयांमध्ये अस्वच्छता बघायला मिळते. भिंतीवर व पायऱ्यांवर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याचे दिसून येते. या प्रक्रियेत जनतेसोबतच कार्यालयीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग असतो. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

वाॅर्डनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावे

चंद्रपूर : कोरोना संकट वाढत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून लस घेणे होय. परंतु, लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे नागरिकांना लसीकरणासाठी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रत्येक वॅार्डात लसीकरण केंद्र निर्माण करावे, अशी मागणी केली जात आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र वाढविणे गरजेचे आहे.

विविध योजनांपासून लाभार्थी वंचित

चंद्रपूर : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते; मात्र या योजनेचा लाभ घेताना वृद्धांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

धोकादायक पुलाला कठडे लावा

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, आता पावसाचे दिवस सुरू झाले असून, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

क्रीडा संकुल सुरू करण्याची मागणी

चंद्रपूर : येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती केली जात आहे. मात्र, मागील अनेक दिवसांपासून काम संथगतीने सुरू असल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे क्रीडा संकुलाचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

मजुरांना दिलासा

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. या कामामुळे लाॅकडाऊनच्या काळात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.