शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

'पैनगंगा' नदीवरील पूल तयार होऊन दीड वर्ष लोटले; पण लोकार्पण केव्हा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:16 IST

प्रशासनाने लक्ष द्यावे: २१ किमीचे अंतर होणार कमी

लोकमत न्यूज नेटवर्क कोरपना : चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या, कोरपना तालुक्यातील पारडी ते झरी व खातेरादरम्यानच्या नदी घाटावर पुलाची निर्मिती झाली. याला दीड वर्षाहून अधिकचा कालावधी लोटला. मात्र, या पुलाचे उ‌द्घाटन, पुलाच्या साइडिंगचे डांबरीकरण, खातेरा गावातील वळण रस्ता आदी कामे प्रलंबितच आहे. त्यामुळे ही कामे कधी होणार, असा सवाल दोन्ही जिल्ह्यांतील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमारेषा असलेल्या, पैनगंगा नदीवरील हा चौथा मोठा पूल आहे. यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी व वणी या दोन तालुक्यांची, चंद्रपूर जिल्ह्यातील एकट्या कोरपना तालुक्याची सीमा या नदीला लागली आहे. कोडशी खु, वनोजा, विरूर पुलानंतर या पुलाच्या निर्मितीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे कोरपना ते मुकुटबन या दोन्ही शहरांना जाण्या-येण्याचा कमी अंतरात प्रवास सुलभ झाला आहे. विशेष म्हणजे कोडशी खु., वनोजा पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर, विरूर पुलाची निर्मिती डब्लूसीएल, तर या नवनिर्मित पुलाची निर्मिती सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडाच्या माध्यमातून झाली आहे; परंतु विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुलाचे लोकार्पण होणे अपेक्षित असताना ते आजतागायत झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. 

पुन्हा किमान दोन पुलांची गरज कोरपना तालुक्यातील गांधीनगर-तेजापूर, भारोसा-जुगाद या दोन पैनगंगा नदीघाटावर पुलाची नितांत आवश्यकता आहे. या मार्गावर पुलाची निर्मिती झाल्यास दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांना पुन्हा रहदारीसाठी कमी अंतरात जाणे येणे सोपे होईल.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर