शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

'त्या' भीषण अपघाताने गाव झाले सुन्न, दहेलीतील 'ती' सहा कुटुंबे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 10:31 IST

या भीषण अपघातात कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर कुणाच्या कुटुंबाचा आधारच हिरावला. तर कुणी एकाचवेळी दोघांना गमावले. आता आमचा वाली कोण, असा आक्रोश दहेली गावात ऐकायला येत आहे.

परिमल डोहणे/राजेश खेडेकर

चंद्रपूर : चंद्रपूर-मूल मार्गावर अजयपूरजवळ लाकडाचा ट्रक व डिझेल टँकरमध्ये झालेला अपघात बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथील सहा कुटुंबांना उद्ध्वस्त करणारा ठरला. या भीषण अपघातात कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर कुणाच्या कुटुंबाचा आधारच हिरावला. तर कुणी एकाचवेळी दोघांना गमावले. आता आमचा वाली कोण, असा आक्रोश दहेली गावात ऐकायला येत आहे.

दहेली हे गाव बल्लापूरपासून राजुरा मार्गावर असलेल्या बामणी गावाजवळ आहे. या गावातील प्रशांत नगराळे, साईनाथ कोडापे, कालू ऊर्फ मंगेश टिपले, महिपाल मडचापे, संदीप आत्राम व बाळकृष्ण तेलंग हे सहा तरुण आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होते. ते लाकडाच्या ट्रकवर मजूर म्हणून काम करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत होते. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले. मात्र नियतीने या सहाही तरुणांसोबत वेगळाच डाव आखला होता. ते कधी परतणार नाहीत, हे मात्र कुणालाही ठाऊक नव्हते. त्यामुळे सर्वच कुटुंब रात्री त्यांची घरी परतण्याची वाट पाहात होते.

रात्री कुणीही परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. काम न झाल्यामुळे ते परतले नसतील, असा धीर त्यांचे कुटुंबीय एकमेकांना देत होते. त्यातच रात्र निघून गेली. मात्र सकाळी अचानक एका ट्रकला लागलेल्या आगीत गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच गावकरी नि:शब्द झाले. ज्याला त्याला विचारणा होऊ लागली. त्यात मृत्युमुखी पडलेले सहा जण गावातील असल्याचे निष्पन्न होताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. घराघरांतून आक्रोश ऐकू येत होता. या अपघातात सहा कुटुंबे एकाएकी उद्ध्वस्त झाली होती. मृतकांमध्ये कुणाचा मुलगा होता. कुणाचे पती होते. तर कुणाचे वडील होते. गावावर पहिल्यांदाच एवढा दु:खाचा डोंगर कोसळला होता. हसत्याखेळत्या गावात एकाएकी शोककळा पसरली.

मृतदेह ओळखण्यातच गेला दिवस

सकाळी घटनास्थळावरून सर्व मृतदेह चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. वैद्यकीय महाविद्यालय गाठून गावकरी व नातेवाइकांनी एकच आक्रोश केला. मृतदेहांची राखरांगोळी झालेली असल्यामुळे कोणता मृतदेह कोणाचा, हे ओळखण्यात संध्याकाळ झाली. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मृतदेह मिळाले. गावात गावकरी ग्रामपंचायतीजवळ गोळा होऊन शोकाकुल वातावरणात मृतदेहांची वाट पाहात होते.

अपघातात कुणाची चूक?

दोन वाहनांमध्ये धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र अपघात होण्यासाठी कुणातरी एका वाहनधारकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले असेल, दोन्ही वाहने भरधाव जात असतील वा एक वाहन भरधाव जात होते की वळणमार्ग अपघाताला कारणीभूत ठरला? यात दोन्ही वाहनचालकांचा होरपळून मृत्यू झाल्याने नेमकी चूक कोणाची, याचा शोध घेण्याची गरज आहे. ही चूक कशी झाली, याचाही शोध घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

कुणी बाप गमावला तर कुणी मुलगा

बाळकृष्ण तेलंग यांच्या कुटुंबात म्हातारी आई, पत्नी, लग्नाची मुलगी आणि शिक्षण घेत असलेला एक मुलगा आहे. घरातील तोच एकमेव कर्ता पुरुष होता. अपघातातील त्याच्या मृत्यूने कुटुंबच उघड्यावर आले आहे. साईनाथ कोडापे आपल्या आईचा एकमेव आधार होता. त्याच्या बहिणीचे काही वर्षांपूर्वीच मंगेश टिपले याच्याशी लग्न झाले होते. या अपघातात साईनाथ व मंगेश या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे मंगेशची पत्नी व एक दोन वर्षांचा व एक तीन वर्षांचा मुलगा पोरका झाला तर साईनाथची आई ही एकटी पडली आहे. महिपाल मडचापे हा आई-वडिलांचा एकमेव आधार होता. या अपघाताने त्याचा आधार हिरावला आहे. तर अक्षय डोंगरेच्या मृत्यूने आई-वडील व त्याची बहीण पोरकी झाली आहे. तोहगाव येथील संदीप आत्रामच्या मृत्यूमुळे त्याच्या आई-वडिलांचा आधार हरपला आहे.

एकाच चितेवर पाच जणांना अग्नी

मृतदेहाचे चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर तोहगाव येथील संदीप आत्रामचा मृतदेह तोहोगावला पाठविण्यात आला. तर दहेली येथील सहाही जणांचे मृतदेह एकाच गाडीमध्ये दहेली येथे नेण्यात आले. रात्री ८ वाजेच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या पटांगणात सर्वांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये एकच चिता रचून सर्वांचे मृतदेह त्याच ठिकाणी ठेवून अग्नी देण्यात आला. हा प्रसंग उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता. 

टॅग्स :Accidentअपघातchandrapur-acचंद्रपूर