शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

९२ गावांना बसणार पाणीटंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार २६२ मिमी आहे. मागील वर्षी ९०२.५१ मिमी पाऊस पडला ...

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा अहवालअल्प पावसामुळे आटल्या विहिरीजि. प.च्या उपाययोजनेकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १ हजार २६२ मिमी आहे. मागील वर्षी ९०२.५१ मिमी पाऊस पडला होता. मागील वर्षाच्या तुलनेत केवळ ७९ टक्के पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील ९२ गावांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.भूजल सर्वेक्षण व विकास विभागाच्या १३४ निरीक्षण विहिरीतील पाण्याच्या पातळीचे निरीक्षण वर्षातून तीनदा केले जाते. जानेवारी, मार्च व सप्टेंबर महिन्यात या विहिरीतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतल्यानंतर पाणीटंचाईची स्थिती जाहीर केल्या जाते. जानेवारी महिन्यात भूजल यंत्रणेने विहिीरींतील पाण्याच्या पातळीची नोंद घेतली. त्यानुसार जिल्ह्यातील पाण्याच्या पातळीत ०.४९ सेंटिमीटरने घट झाल्याचे वास्तव पुढे आले. बल्लारपूर १.१४ तर भद्रावती तालुक्याची पातळी १.२९ सेंटिमीटरने घटली. अन्य तालुक्यांचीही स्थिती सारखीच असल्याचे पुढे आले. सावली तालुक्यातील १० गावे, कोरपना ८, चिमूर ७, राजुरा ६, भद्रावती ७, आणि चंद्रपूर तालुक्यातील ७ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची वेळ येणार आहे.पाणी टंचाईसदृश परिस्थितीचा अहवाल संबंधित यंत्रणेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग टंचाई आराखडा तयार करणार आहे. जिल्ह्यातील जिवती, कोरपना, सावली, मूल, सिंदेवाही, चिमूर, राजुरा, चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातील ४७ गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. यंदा अल्प पाऊस पडल्याने शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली. अनेक शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिके वाचण्यासाठी धडपड करावी लागली. त्यामुळे तत्काळ उपाययोजनेची मागणी केली जात आहे.तीन गावांची पाणीपुरवठा योजना ठप्पगांगलवाडी : ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज, रूई, पाचगाव येथील नळयोजना महिनाभरापासून बंद आहे. त्यामुळे या गावांतील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जि. प. प्रशासनाने उपाययोजना न केल्याने तीव्र संताप व्यक्त केल्या जात आहे.नीलज, रूई व पाचगाव येथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची नळयोजना आहे. काही महिन्यांपासून ब्रह्मपुरी - आरमोरी या राष्टÑीय मार्गाचे काम सुरू आहे. जुनी पाइपलाईन या मार्गाच्या आड आहे. पुणे येथील कंत्राटदाराकडून महिनाभरापासून नवीन पाइपलाईनचे काम सुरू आहे. पण नवीन पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटली. त्यामुळे गावातील टाकीपर्यंत पाणी पोहोचत नाही. पुरेसे पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. फुटलेल्या पाइपलाइनमधील पाणी आजूबाजूच्या शेतात शिरत आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पाइपलाईनचे काम निकृष्ट झाल्यानेच ही परिस्थिती उद्भवली. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्याला माहिती देण्यात आली. मात्र, दखल घेतली नाही, असा आरोप सरपंच कविता राहाटे, सुजीत बालपांडे, रंजना शिऊरकार आदींनी केल आहे.