शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

९१ हजार शेतकरी : धान, कापूस, सोयाबीनची नुकसान भरपाई मिळणार

By admin | Updated: September 19, 2016 00:48 IST

यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे.

पीक विम्यापोटी भरला६८५ कोटींचा हप्ताचंद्रपूर : यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे. त्यामध्ये शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये वाटा दिला असून शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपये विमा हप्ता भरला आहे. जिल्ह्यामध्ये धान, कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने प्रामुख्याने या पिकांचा विमा मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देण्यात येते. या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी पत पुरवठ्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेत धान पिकाला ७० टक्के जोखीम स्तर धरण्यात येऊन हेक्टरी ३९ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम मिळणार आहे. त्यामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस कंपनीला उंबरठा पातळीपर्यंत हेक्टरी २ हजार ६२८ रुपये विमा हप्ता द्यायचा होता. शेतकऱ्यांना ७८० रुपयांचा विमा हप्ता ठरविण्यात आला. तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आपापल्या वाट्याचे प्रत्येकी ९२४ रुपये शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीला दिले आहेत. सोयाबीनमध्येदेखील ७० टक्के जोमीख स्तर ठेवण्यात आला आहे. तर ३६ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम आहे. उंबरठा पातळीपर्यंत विमा हप्ता २ हजार ८८० रुपये आहे. त्यात शेतकऱ्यांकडून ७२० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी १०८० रुपये आपापला वाटा दिला आहे. कापूस पिकासाठीही ३६ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. विमा हप्त्याची उंबरठा पातळीपर्यंत रक्कम २३४० रुपये आहे.शेतकऱ्यांना कापूस विमा हप्ता म्हणून १८०० रुपये भरावे लागले. तर केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी २७० रुपयांचा आपापला वाटा भरला. तूर पिकाला २८ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ठरविण्यात आली आहे. उंबरठा पातळीपर्यंत ४ हजार ७०४ रुपये विमा हप्ता भरण्यात आला. त्यात शेतकऱ्यांना हेक्टरी ५६० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने २ हजार ७२ रुपये भरले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ९० हजारकर्जदार शेतकरीराज्याच्या इतर भागातील शेतकऱ्यांप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही कर्जदार शेतकऱ्यांनी सुमारे ९९ टक्के संख्या आहे. पीक विमा काढणाऱ्या एकूण ९१ हजार २२५ शेतकऱ्यांपैकी सुमारे ९० हजार २८८ शेतकरी कर्जबाजारी आहेत. त्यांची खाती जिल्हा बँकेसह कोणत्या ना कोणत्या बॅकेत आहे. त्यामुळे विमा काढणारया या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी ७८ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला आहे. तर कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केवळ ८१५ हेक्टर क्षेत्रातील पीक विमा काढला आहे.सर्वच तालुक्यातधानाला विमा संरक्षणजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये धान पिकाला संरक्षण दिले आहेत. तर सोयाबीन पीक सिंदेवाही तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे. तूर पीक ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यात अधिसूचित करण्यात आलेले नाही. उर्वरित तालुक्यांमध्ये तुरीचा पीक विमा काढण्यात आला आहे. कापूस चंद्रपूर, गोंडपिंपरी, वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात अधिसूचित करण्यात आला आहे. मूग व उडिद केवळ ब्रह्मपुरी तालुक्यात अधिसूचित करण्यात आले.केंद्र-राज्य वाटा समानया योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाटा समान आहे. त्यानुसार जिल्ह्यात ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी १५ कोटी ६३ लाख २७ हजार १३० रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ९ लाख २२ हजार ८२९ रुपये भरले आहेत. त्याच वेळी केंद्र व राज्य शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये भरले आहेत. कर्जदारांचे ६६५ कोटी ८६ लाख ८७ हजार ५९ रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे ४ कोटी १२ लाख ८१२ रुपये भरले आहेत.