शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

९१ हजार शेतकरी : धान, कापूस, सोयाबीनची नुकसान भरपाई मिळणार

By admin | Updated: September 19, 2016 00:48 IST

यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे.

पीक विम्यापोटी भरला६८५ कोटींचा हप्ताचंद्रपूर : यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी सुमारे ७९ हजार २६४ हेक्टरमधील पिकांचा हा विमा काढला आहे. त्यामध्ये शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये वाटा दिला असून शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपये विमा हप्ता भरला आहे. जिल्ह्यामध्ये धान, कापूस आणि सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याने प्रामुख्याने या पिकांचा विमा मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येते. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास विमा संरक्षण देण्यात येते. या माध्यमातून कृषी क्षेत्रासाठी पत पुरवठ्यात सातत्य राखण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेत धान पिकाला ७० टक्के जोखीम स्तर धरण्यात येऊन हेक्टरी ३९ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम मिळणार आहे. त्यामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस कंपनीला उंबरठा पातळीपर्यंत हेक्टरी २ हजार ६२८ रुपये विमा हप्ता द्यायचा होता. शेतकऱ्यांना ७८० रुपयांचा विमा हप्ता ठरविण्यात आला. तर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आपापल्या वाट्याचे प्रत्येकी ९२४ रुपये शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीला दिले आहेत. सोयाबीनमध्येदेखील ७० टक्के जोमीख स्तर ठेवण्यात आला आहे. तर ३६ हजार रुपये विमा संरक्षण रक्कम आहे. उंबरठा पातळीपर्यंत विमा हप्ता २ हजार ८८० रुपये आहे. त्यात शेतकऱ्यांकडून ७२० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी १०८० रुपये आपापला वाटा दिला आहे. कापूस पिकासाठीही ३६ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. विमा हप्त्याची उंबरठा पातळीपर्यंत रक्कम २३४० रुपये आहे.शेतकऱ्यांना कापूस विमा हप्ता म्हणून १८०० रुपये भरावे लागले. तर केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी २७० रुपयांचा आपापला वाटा भरला. तूर पिकाला २८ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम ठरविण्यात आली आहे. उंबरठा पातळीपर्यंत ४ हजार ७०४ रुपये विमा हप्ता भरण्यात आला. त्यात शेतकऱ्यांना हेक्टरी ५६० रुपये आणि केंद्र व राज्य शासनाने २ हजार ७२ रुपये भरले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ९० हजारकर्जदार शेतकरीराज्याच्या इतर भागातील शेतकऱ्यांप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातही कर्जदार शेतकऱ्यांनी सुमारे ९९ टक्के संख्या आहे. पीक विमा काढणाऱ्या एकूण ९१ हजार २२५ शेतकऱ्यांपैकी सुमारे ९० हजार २८८ शेतकरी कर्जबाजारी आहेत. त्यांची खाती जिल्हा बँकेसह कोणत्या ना कोणत्या बॅकेत आहे. त्यामुळे विमा काढणारया या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी ७८ हजार ४४९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढला आहे. तर कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी केवळ ८१५ हेक्टर क्षेत्रातील पीक विमा काढला आहे.सर्वच तालुक्यातधानाला विमा संरक्षणजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये धान पिकाला संरक्षण दिले आहेत. तर सोयाबीन पीक सिंदेवाही तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये अधिसूचित करण्यात आले आहे. तूर पीक ब्रह्मपुरी, नागभीड आणि सिंदेवाही तालुक्यात अधिसूचित करण्यात आलेले नाही. उर्वरित तालुक्यांमध्ये तुरीचा पीक विमा काढण्यात आला आहे. कापूस चंद्रपूर, गोंडपिंपरी, वरोरा, भद्रावती, चिमूर, राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात अधिसूचित करण्यात आला आहे. मूग व उडिद केवळ ब्रह्मपुरी तालुक्यात अधिसूचित करण्यात आले.केंद्र-राज्य वाटा समानया योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाटा समान आहे. त्यानुसार जिल्ह्यात ९१ हजार २२५ शेतकऱ्यांनी १५ कोटी ७२ लाख ४९ हजार ९५९ रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी १५ कोटी ६३ लाख २७ हजार १३० रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ९ लाख २२ हजार ८२९ रुपये भरले आहेत. त्याच वेळी केंद्र व राज्य शासनाने ६६९ कोटी ९८ लाख ८७ हजार ८७१ रुपये भरले आहेत. कर्जदारांचे ६६५ कोटी ८६ लाख ८७ हजार ५९ रुपये आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे ४ कोटी १२ लाख ८१२ रुपये भरले आहेत.