शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

८२७ ग्रामपंचायती, ८० हजार झाडांचे लक्ष्य! चंद्रपूरमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेतून वृक्षलागवडीची जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:45 IST

जिल्हा परिषद प्रशासनाकडून तयारी सुरू : उपक्रमात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा राहणार सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : 'एक पेड माँ के नाम' या अभिनव संकल्पनेतून केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने देशभर वृक्षलागवडीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० रोपांची लागवड करावी, अशा सूचना पंचायतराज संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातही सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हजारो वृक्षांचे रोपण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक रोपाला लागवड करणाऱ्या व्यक्तीच्या मातोश्रींचे नाव दिले जाणार आहे. या भावनिक संकल्पनेमुळे वृक्षलागवडीस वैयक्तिक व सामाजिक समर्पणाची भावनाही जोडली जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेशी सुसंगत अशी ही मोहीम केवळ पर्यावरण संवर्धनापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक बांधिलकीची भावना जागवणारी ठरत आहे. शासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने १०० झाडे लावल्यास, ८० हजारांवर वृक्षारोपण होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा उपक्रम'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात येत आहे. 

जिल्ह्यात वृक्षारोपणाला झाली सुरुवातजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात ५ जूनपासून या मोहिमेंतर्गत काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

'मर' लागलेल्या झाडांच्या जागी ३१ डिसेंबरपूर्वी पुन्हा रोपण'एक पेड माँ के नाम' या मोहिमेतून जी रोपे योग्यरीत्या तग धरू शकणार नाहीत, त्यांच्या जागी ३१ डिसेंबरपूर्वी पुनर्लागवड केली जाणार आहे.

जिल्ह्यातील ८२७ग्रामपंचायती समाविष्ट !जिल्ह्यात ८२७ ग्रामपंचायती असून, सर्व ठिकाणी रोपांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

'एक पेड माँ के नाम' मोहिमेची तयारीजिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभागी करून घेत विशेष वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे.

मातोश्रींच्या नावाने झाडांना ओळखगाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आल्यानंतर त्या प्रत्येक झाडांचे संगोपन करणारी व्यक्ती आपल्या आईच्या नावाने त्या झाडाचे नामकरण करणार असल्याची संकल्पना आहे.

शासकीय कार्यालये, शाळांच्या आवारात झाडे लावणारग्रामपंचायत व्यतिरिक्त शाळा, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्र, तलाठी व मंडळ कार्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.

"वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेमुळे ग्रामीण स्तरावर पर्यावरण जागृती आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी सुरू आहे."- पुलकित सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर