शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

बीआयटी उभारणार ८०० शौचालये

By admin | Updated: October 7, 2015 02:07 IST

ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करीत बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने (बीआयटी) बल्लारपूर ...

गोदरीमुक्तीचा संकल्प : विद्यार्थ्यांसाठी अभियंते घेणार पुढाकारचंद्रपूर : ग्रामीण आरोग्य आणि स्वच्छतेचा विचार करीत बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजीने (बीआयटी) बल्लारपूर तालुक्यातील दहा गावांमध्ये ८०० शौचालये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महाविद्यालयातील एमबीएचे विद्यार्थी आणि बीआयटीचे अभियंते पुढाकार घेणार आहेत.अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या उपस्थितीत या संदर्भात अलिकडेच एक बैठक पार पडली. यावेळी सरपंच सुशीला मडावी (कळमना), शिवकला आत्राम (किन्ही), सविता धोडरे (मानोरा), शकुंतला टोंगे (कोर्टी मक्ता), शंकर खोब्रागडे (पळसगाव), अर्चना वासाडे (आमडी), वासुदेव येरगुडे (किन्ही) आणि इटोलीचे सरपंच गोपाल बोभाटे बैठकीत सहभागी झाले होते.मागील काही वर्षांपासून बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजीतर्फे ग्रामीणांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सामूहिक शेतीच्या माध्यमातून करण्याचा प्रकल्प बीआयटीने उभारला आहे. आता बीआयटीच्या परिसरात असणाऱ्या गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांना आजही उघड्यावर शौचास जावे लागते. शासनाच्या आवाहनाला जनतेकडून तसा प्रतिसाद दिसत नाही. शौचालय बांधण्यासाठी शासनाने १२ हजार रुपयाचे अनुदान जाहीर केलेले असताना बऱ्याच लोकांना शेतीच्या कामामुळे व इतर व्यस्ततेमुळे शौचालय बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करणे कठीण होवून बसले. या विषयाचा अभ्यास बीआयटीने केल्यानंतर एका दिवसात तयार होणारे शौचालय बांधून दिल्यास अनेक गावे गोदरीमुक्त होऊ शकतात. ही संकल्पना समोर आली. त्याच आधारावर प्रायोगिक तत्वावर येनबोडी येथे एक शौचालय उभारण्यात आल्यानंतर परिसरातील कळमना, किन्ही, मानोरा, कोर्टीमक्ता, पळसगाव, आमडी, इटोली, कोठारी येथील सर्वेक्षण बीआयटीच्या माध्यमातून करण्यात आले. कळमना येथे २८, मानोऱ्यात ८०, कोर्टीमक्ता येथे ३०, पळसगाव ६०, आमडी येथे ३०, इटोली येथे ३० तर कोठारी येथे १७५ याप्रमाणे इतर गावांचा विचार केला असता एकूण ८०० शौचालय उभारल्यास दहा गावे गोदरीमुक्त होऊ शकतात, असे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या अनुदानाचा वापर करीत शौचालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत गुरू, चंदा सोयाम, उपसरपंच सुनील बावणे, वासुदेव येरगुडे, मधुकर बोंडे, गोविंदा उपरे, धाडू दुधबळे यांच्यासह सरपंच उपसरपंचाची व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)