शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

५२ ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:40 IST

जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी आज सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देआज मतमोजणी : कुठेही अनुचित प्रकार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ५२ ग्रामपंचायतींसाठी आज सोमवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व तालुकेमिळून सरासरी ८० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी चिखले यांनी दिली.जिल्ह्यातील मूल, राजूरा, चंद्रपूर, भद्रावती, नागभीड, जीवती, वरोरा, पोंभुर्णा, चिमूर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीत ही निवडणूक होत आहे. सोमवारी मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. नागभीड तालुक्यातील चिखलगाव, गोविंदपूर, गिरगाव, मांगली आणि मिंथूर या पाच ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ७९ टक्के, बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, बामणी, कवडझई, इटोली आणि काटवली (बामणी) या पाच ग्रामपंचायतीसाठी सरासरी ६९ टक्के मतदान झाले.भद्रावती तालुक्यातील रानतळोधी विसलोन, गुंजाळा, टेकाडी, चिचोली, चारगाव, धानोली या सात ग्रामपंचायतींमध्ये सरासरी ६९.९२ टक्के मतदान झाले. पोंभूर्णा तालुक्यातील बोर्डा झुल्लूरवार व बोर्डा बोरकर या दोन ग्रामपंचायतीमध्ये सरासरी ८५ टक्के मतदान झाले. मूल तालुक्यातील उश्राळा चक, बेंबाळ, बोंडाळा खुर्द, आकापूर, गडीसुर्ला, बाबराळा आणि चकदुगाळा या सात ग्रामपंचायतींमिळून सरासरी ८२.५२ टक्के तर कोरपना तालुक्यातील बाखर्डी, कुकडसाथ, निमनी, कवठाला, गाडेगाव (विरुर), अंतरगाव, कोडशी, माथा, बोरगाव या नऊ ग्रामपंचायतींसाठी ८५ टक्के मतदान झाले.चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर), सोनेगाव (वन), रेंगाबोडी व आमडी (बेगडे) या चार ग्रामपंचायतीसाठी सरासरी ८७.६० टक्के मतदान झाले.राजुरा तालुक्यातील देवाळा, हरदोना खुर्द, विरुर स्टेशन, डोंगरगाव या ग्रामपंचायतीसाठी एकूण सरासरी ७५ टक्के मतदान झाले. चंद्रपूर तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीसाठी सरासरी ७८ टक्के तर जिवती तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी ८१ टक्के मतदान झाले.बॉक्सजिल्ह्यातील सर्व ५२ ग्रामपंचायतींमध्ये अतिशय शांततेत मतदान झाले. यातील ४१८ सदस्य व ४९ सरपंच पदासाठी एकूण १५०१ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वांचे भाग्य आज मशीनबंद झाले. मंगळवारी सकाळी १० वाजता संबंधित तालुकास्थळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.वरोरा तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीमध्ये ९३ टक्के मतदान झाले.कोठारी येथे रात्रीपर्यंत चालले मतदानबल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील प्रभाग क्रमांक पाच मध्ये १ हजार १०१ मतदार आहेत. या मतदान केंद्रावर मतदारांनी दुपारी ४ वाजता पासून मतदानासाठी येण्यास सुरूवात केली.दरम्यान वीज पुरवठाही खंडित झाला. यामुळे मतदानाची वेळ सकाळी ७वाजता ते सायंकाळी ५.३० वाजता असूनही रात्री ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रीया सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाºयांनी दिली.