शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

वन्यप्राण्यांच्या नुकसानीपोटी ७.९१ कोटींंची भरपाई

By admin | Updated: October 4, 2016 00:45 IST

जिल्हयात वनांचे प्रमाण भरपूर आहे. या वनांमध्ये विविध प्रकारचे प्राणीही मोठया प्रमाणावर आहे.

नुकसानीची १३ हजार ३९८ प्रकरणे : भरपाईचा शेतकऱ्यांना दिलासाचंद्रपूर : जिल्हयात वनांचे प्रमाण भरपूर आहे. या वनांमध्ये विविध प्रकारचे प्राणीही मोठया प्रमाणावर आहे. या प्राण्यांकडून शेती व अन्य पिकांच्या होणा-या नुकसानीचा मोबदला शासनाकडून दिला जातो. जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात झालेल्या विविध नुकसानीपोटी शेतक-यांना ७ कोटी ९१ लक्ष रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.वन्यप्राण्यामुळे कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वत्र हल्ले व शेती पिकांचे नुकसान होत असते. अशा नुकसानीत नुकसाग्रस्त शेतक-याना मदतीचा हात शासनाच्या वतीने दिला जातो. नुकसान झाल्यास वन विभागाच्या वतीने नुकसानीची पाहणी करुन मदत केली जात असते. वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसानीमध्ये काही प्रसंगी मनुष्यहानी होते. मनुष्य जखमी होणे, पशुधनहानी, पशु जखमी, पीकहानी अशा घटना घडत असतात.२०१५-१६ मध्ये नुकसानीची ११ हजार २४७ प्रकरणे घडली होती. या पोटी नुकसान भरपाई म्हणून ६ कोटी २६ लाख रुपये मदत देण्यात आली. या वर्षात सहा मनुष्यहानीची प्रकरणे होती. या व्यक्तींच्या कुटुंबियाना ४७ लाखांची मदत वन विभागाने केली. हल्ल्यार १५४ जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. या जखमींना ५६ लाख ३२ हजार रुपये मदत देण्यात आली आहे. पशुधन हानीच्या १४८८ घटनेत ९० लाख ५० हजार तर पशु जखमीच्या १२६ प्रकरणात १ लाख ८ हजारांची मदत वितरित करण्यात आली आहे.याच वर्षी पीकहानीची ९ हजार ४७३ प्रकरणे उद्भवली होती. यामध्ये शेतीपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ४ कोटी ३१ लाख ४४ हजार रुपये वन विभागाच्या वतीने वितरित करण्यात आले आहे. यावर्षी जून अखेर २ हजार १५१ नुकसानीची प्रकरणे घडली आहे. या प्रकरणामध्ये १ कोटी ६५ लाखांची मदत जूनपर्यंत देण्यात आली आहे. यामध्ये मनुष्यहानीच्या तीन प्रकरणांत २३ लाख, मनुष्य जखमीच्या १६ प्रकरणात ४ लाख ४३ हजार, पशुधन हानीची २१० प्रकरणे व १३ लाख ७७ हजार, पीकहानीची १९१७ प्रकरणे घडली असून यातील १ कोटी २३ लाख ५८ हजार वितरित करण्यात आले.