शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
4
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
5
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
6
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
7
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
8
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
9
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
10
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
11
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
12
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
13
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
14
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
15
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
16
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
17
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
18
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
19
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
20
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू

कौटुंबिक कलहातून ७७५ जणांनी सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक ...

सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक कलह आणखी वाढू नये, म्हणून अनेकांनी स्वत:हून घर सोडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सुन-सासूचे भांडण, सुनेकडून ज्येष्ठ आई-वडिलांच्या अवहेलना यामुळे अनेकांनी आपल्या मुलाचे तर काहीनी मुलीला त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात आश्रय घेतला. तर काही वृद्धांनी आश्रम जवळ केल्यास मुलगा, मुलगी यांची बदनाम होईल म्हणून थेट कुणालाही न सांगता घरच सोडले. तर अनेक मुले-मुली आई-वडिलांकडून किटकिट नको म्हणून किंवा आमिषाला बळी पडून तसेच सासरच्या व्यक्तीकडून छळ झाल्यास घर सोडून गेली आहेत. सन २०२० मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून २६५ पुरुष, ५१० महिला बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये १९८ पुरुष व ४०० महिलांचा शोध लागला आहे, तर अद्यापही १७७ जणांचा शोध सुरू आहे.

घर सोडून जाण्याचे कारण

कौटुंबिक कलहातून अनेकांनी घर सोडले आहे. त्यासोबतच मुलगा आणि सुनेकडून अवहेलना होत असल्यामुळे त्रासून ज्येष्ठ आई-वडिलांनी घर सोडले. तर अनेक मुले-मुली यांनी आई-वडिलांची किटकिट नको म्हणून घर सोडले. तर अनेक मुले-मुली आमिषाला बळी पडून स्वत:हून घर सोडून पळाल्या आहेत. तर सासूच्या त्रासाला कंटाळून अनेक सुनांनी घर सोडल्याचा प्रकार दिसून येत आहे. काही जणांचा तपास पोलिसांनी लावला आहे.