शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

कौटुंबिक कलहातून ७७५ जणांनी सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक ...

सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक कलह आणखी वाढू नये, म्हणून अनेकांनी स्वत:हून घर सोडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सुन-सासूचे भांडण, सुनेकडून ज्येष्ठ आई-वडिलांच्या अवहेलना यामुळे अनेकांनी आपल्या मुलाचे तर काहीनी मुलीला त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात आश्रय घेतला. तर काही वृद्धांनी आश्रम जवळ केल्यास मुलगा, मुलगी यांची बदनाम होईल म्हणून थेट कुणालाही न सांगता घरच सोडले. तर अनेक मुले-मुली आई-वडिलांकडून किटकिट नको म्हणून किंवा आमिषाला बळी पडून तसेच सासरच्या व्यक्तीकडून छळ झाल्यास घर सोडून गेली आहेत. सन २०२० मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून २६५ पुरुष, ५१० महिला बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये १९८ पुरुष व ४०० महिलांचा शोध लागला आहे, तर अद्यापही १७७ जणांचा शोध सुरू आहे.

घर सोडून जाण्याचे कारण

कौटुंबिक कलहातून अनेकांनी घर सोडले आहे. त्यासोबतच मुलगा आणि सुनेकडून अवहेलना होत असल्यामुळे त्रासून ज्येष्ठ आई-वडिलांनी घर सोडले. तर अनेक मुले-मुली यांनी आई-वडिलांची किटकिट नको म्हणून घर सोडले. तर अनेक मुले-मुली आमिषाला बळी पडून स्वत:हून घर सोडून पळाल्या आहेत. तर सासूच्या त्रासाला कंटाळून अनेक सुनांनी घर सोडल्याचा प्रकार दिसून येत आहे. काही जणांचा तपास पोलिसांनी लावला आहे.