शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

कौटुंबिक कलहातून ७७५ जणांनी सोडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:32 IST

सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक ...

सध्याच्या युगात संयुक्त कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे. यामुळे कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. कौटुंबिक कलह आणखी वाढू नये, म्हणून अनेकांनी स्वत:हून घर सोडल्याच्या अनेक तक्रारी आहेत. सुन-सासूचे भांडण, सुनेकडून ज्येष्ठ आई-वडिलांच्या अवहेलना यामुळे अनेकांनी आपल्या मुलाचे तर काहीनी मुलीला त्रास नको म्हणून वृद्धाश्रमात आश्रय घेतला. तर काही वृद्धांनी आश्रम जवळ केल्यास मुलगा, मुलगी यांची बदनाम होईल म्हणून थेट कुणालाही न सांगता घरच सोडले. तर अनेक मुले-मुली आई-वडिलांकडून किटकिट नको म्हणून किंवा आमिषाला बळी पडून तसेच सासरच्या व्यक्तीकडून छळ झाल्यास घर सोडून गेली आहेत. सन २०२० मध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातून २६५ पुरुष, ५१० महिला बेपत्ता झाल्या आहेत. यामध्ये १९८ पुरुष व ४०० महिलांचा शोध लागला आहे, तर अद्यापही १७७ जणांचा शोध सुरू आहे.

घर सोडून जाण्याचे कारण

कौटुंबिक कलहातून अनेकांनी घर सोडले आहे. त्यासोबतच मुलगा आणि सुनेकडून अवहेलना होत असल्यामुळे त्रासून ज्येष्ठ आई-वडिलांनी घर सोडले. तर अनेक मुले-मुली यांनी आई-वडिलांची किटकिट नको म्हणून घर सोडले. तर अनेक मुले-मुली आमिषाला बळी पडून स्वत:हून घर सोडून पळाल्या आहेत. तर सासूच्या त्रासाला कंटाळून अनेक सुनांनी घर सोडल्याचा प्रकार दिसून येत आहे. काही जणांचा तपास पोलिसांनी लावला आहे.