शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

७७.२६ टक्के वीजबिलांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.

ठळक मुद्देमहावितरणची जनजागृती : विभागात सात लाख ८७ हजार ग्राहक

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटाचा फटका  महावितरण कंपनीलाही बसला आहे. दरम्यान, अद्यापही काही ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. वीज बिल माफ करण्याच्या मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. मात्र, शासनाने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही. या काळात थकीत वीज बिल वसुलीचे मोठे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे. यासाठी  जनजागृती मोहीम महावितरणने हाती घेतली. दरम्यान, आक्टोबर महिन्यापर्यंत ७७.२६ टक्के वीज बिलांची वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.चंद्रपूर सर्कलमध्ये बल्लापूर, चंद्रपूर आणि वरोरा विभागाचा समावेश आहे. १ मार्च ते २६ आक्टोबर या दरम्यान लघु दाबाच्या वीज ग्राहकांची थकबाकी ४४९ कोटींवर पोहोचली होती. त्याचा भरणा २७९ कोटी म्हणजे ६३.१४ टक्के होऊ शकला. यामध्ये बल्लारपूर विभाग ५५.६२  टक्के, चंद्रपूर विभाग ६७.८७ टक्के इतका विजभरणा होऊ शकला. आलापल्ली विभाग ५२.६० टक्के, ब्रह्मपुरी विभाग ५८.८१ टक्के आणि गडचिरोली विभागातून ६४.४५ टक्के, इतका भरणा करण्यात आला. 

वीज बिल माफ करण्याची मागणी पडली मागेलाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे, २०० युनिटपर्यंत बिलामध्ये सुट द्यावी, आदी मागण्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये करण्यात आल्या होत्या. यासाठी काही राजकीय तसेच सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र सध्या ही मागणी मागे पडली आहे.

मोबाईल संदेशवीज बिल भरण्यासंदर्भात ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. दरम्यान, काही ग्राहकांसोबत थेट संवादही साधण्यात आला. याचा फायदा महावितरणला झाला. सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी वीज कट होईल, ही भीती त्यांना आहे. त्यामुळे उसनवारी करून बील भरण्याचा प्रयत्न ते  करीत आहे.  ग्रामीण भागातील भरना जास्त आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्राहकांना अतिरीक्त वीज बिल आले. त्यातच सर्वच बंद असल्यामुळे बिल भरण्याची समस्या होती. त्यामुळे अनेकांनी वीज बिल थकविले. दरम्यान, काहींनी आनलाईन भरना केला.

टॅग्स :electricityवीज