शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

७७.२६ टक्के वीजबिलांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.

ठळक मुद्देमहावितरणची जनजागृती : विभागात सात लाख ८७ हजार ग्राहक

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटाचा फटका  महावितरण कंपनीलाही बसला आहे. दरम्यान, अद्यापही काही ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. वीज बिल माफ करण्याच्या मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. मात्र, शासनाने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही. या काळात थकीत वीज बिल वसुलीचे मोठे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे. यासाठी  जनजागृती मोहीम महावितरणने हाती घेतली. दरम्यान, आक्टोबर महिन्यापर्यंत ७७.२६ टक्के वीज बिलांची वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.चंद्रपूर सर्कलमध्ये बल्लापूर, चंद्रपूर आणि वरोरा विभागाचा समावेश आहे. १ मार्च ते २६ आक्टोबर या दरम्यान लघु दाबाच्या वीज ग्राहकांची थकबाकी ४४९ कोटींवर पोहोचली होती. त्याचा भरणा २७९ कोटी म्हणजे ६३.१४ टक्के होऊ शकला. यामध्ये बल्लारपूर विभाग ५५.६२  टक्के, चंद्रपूर विभाग ६७.८७ टक्के इतका विजभरणा होऊ शकला. आलापल्ली विभाग ५२.६० टक्के, ब्रह्मपुरी विभाग ५८.८१ टक्के आणि गडचिरोली विभागातून ६४.४५ टक्के, इतका भरणा करण्यात आला. 

वीज बिल माफ करण्याची मागणी पडली मागेलाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे, २०० युनिटपर्यंत बिलामध्ये सुट द्यावी, आदी मागण्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये करण्यात आल्या होत्या. यासाठी काही राजकीय तसेच सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र सध्या ही मागणी मागे पडली आहे.

मोबाईल संदेशवीज बिल भरण्यासंदर्भात ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. दरम्यान, काही ग्राहकांसोबत थेट संवादही साधण्यात आला. याचा फायदा महावितरणला झाला. सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी वीज कट होईल, ही भीती त्यांना आहे. त्यामुळे उसनवारी करून बील भरण्याचा प्रयत्न ते  करीत आहे.  ग्रामीण भागातील भरना जास्त आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्राहकांना अतिरीक्त वीज बिल आले. त्यातच सर्वच बंद असल्यामुळे बिल भरण्याची समस्या होती. त्यामुळे अनेकांनी वीज बिल थकविले. दरम्यान, काहींनी आनलाईन भरना केला.

टॅग्स :electricityवीज