शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

७७.२६ टक्के वीजबिलांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 05:00 IST

जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.

ठळक मुद्देमहावितरणची जनजागृती : विभागात सात लाख ८७ हजार ग्राहक

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटाचा फटका  महावितरण कंपनीलाही बसला आहे. दरम्यान, अद्यापही काही ग्राहकांनी वीज बिल भरले नाही. वीज बिल माफ करण्याच्या मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. मात्र, शासनाने अद्याप तरी कोणताही निर्णय घेतला नाही. या काळात थकीत वीज बिल वसुलीचे मोठे आवाहन महावितरण कंपनीसमोर आहे. यासाठी  जनजागृती मोहीम महावितरणने हाती घेतली. दरम्यान, आक्टोबर महिन्यापर्यंत ७७.२६ टक्के वीज बिलांची वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वीज पुरवठा केल्या जातो. या दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ८७ हजार ५७९ ग्राहक आहेत. यात चंद्रपूर परिमंडळाचे ४ लाख ३८ हजार ३४२ तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. २९६ ग्राहक उच्च दाबाच्या विजेचा वापर करतात.चंद्रपूर सर्कलमध्ये बल्लापूर, चंद्रपूर आणि वरोरा विभागाचा समावेश आहे. १ मार्च ते २६ आक्टोबर या दरम्यान लघु दाबाच्या वीज ग्राहकांची थकबाकी ४४९ कोटींवर पोहोचली होती. त्याचा भरणा २७९ कोटी म्हणजे ६३.१४ टक्के होऊ शकला. यामध्ये बल्लारपूर विभाग ५५.६२  टक्के, चंद्रपूर विभाग ६७.८७ टक्के इतका विजभरणा होऊ शकला. आलापल्ली विभाग ५२.६० टक्के, ब्रह्मपुरी विभाग ५८.८१ टक्के आणि गडचिरोली विभागातून ६४.४५ टक्के, इतका भरणा करण्यात आला. 

वीज बिल माफ करण्याची मागणी पडली मागेलाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करावे, २०० युनिटपर्यंत बिलामध्ये सुट द्यावी, आदी मागण्या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये करण्यात आल्या होत्या. यासाठी काही राजकीय तसेच सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र सध्या ही मागणी मागे पडली आहे.

मोबाईल संदेशवीज बिल भरण्यासंदर्भात ग्राहकांना मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले. दरम्यान, काही ग्राहकांसोबत थेट संवादही साधण्यात आला. याचा फायदा महावितरणला झाला. सामान्य ग्राहक आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी वीज कट होईल, ही भीती त्यांना आहे. त्यामुळे उसनवारी करून बील भरण्याचा प्रयत्न ते  करीत आहे.  ग्रामीण भागातील भरना जास्त आहे.लाॅकडाऊनच्या काळामध्ये उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्राहकांना अतिरीक्त वीज बिल आले. त्यातच सर्वच बंद असल्यामुळे बिल भरण्याची समस्या होती. त्यामुळे अनेकांनी वीज बिल थकविले. दरम्यान, काहींनी आनलाईन भरना केला.

टॅग्स :electricityवीज