शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

साडेचार कोटींतून ७७ सिमेंट प्लग बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:28 IST

शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, लघु पाटबंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होत आहे.

ठळक मुद्दे५४१ हेक्टरला सिंचन : तीन कोल्हापुरी बंधाºयांवर ३८ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, लघु पाटबंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होत आहे. २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ४ कोटी ८७ लाख २६ हजार रूपये खर्च करून ७७ सिमेंट प्लग बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. या बंधाऱ्यातून ५४१ हेक्टरवर सिंचन निर्माण झाले आहे.जिल्ह्यात सात ते आठ सिंचन प्रकल्प असले तरी अनेक शेतकºयांना या सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे अनेकांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते. चांगला पाऊस पडला तर उत्पादन नाही तर निराशा, अशी शेतकऱ्यांची स्थिती असते. यावर्षी जिल्ह्यात ५० टक्केच पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पही भरले नाही. परिणामी पिकाला पाणी देण्यासाठी शेवटच्या क्षणी शेतकºयांची धावपळ झाली.दरवर्षी शेवटच्या पाण्यासाठी शेतकऱ्याची होणारी धावपळ थांबविण्यासाठी वाहून जाणाऱ्या नाल्यावर बंधारे बांधण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेने आखला आहे. या कार्यक्रमातून बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. २०१६-१७ या वर्षांत ८ लघु पाटबंधारे तलाव, ४ कोल्हापुरी बंधारे व ८३ सिमेंट प्लग बंधाऱ्यांचे काम सुरू करण्यात आले. यातील ३ कोल्हापुरी बंधारे व ७७ सिमेंट प्लग बंधाºयांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.या तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभभद्रावती तालुक्यातील ५ गावांमध्ये सिमेंट प्लग बंधाऱ्याचे बांधकाम झाले आहे. तर मूल तालुक्यात ६, वरोरा ३, बल्लारपूर १, ब्रह्मपुरी ६, राजुरा १३, कोरपना ५, सिंदेवाही ७, चिमूर १२, जिवती ६, गोंडपिपरी ६, चंद्रपूर १ व नागभीड तालुक्यात ६ गावांमध्ये बंधाºयाचे बांधकाम झाले आहे.