शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

जिल्ह्यात ७० टक्के रस्ते खड्डेमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:08 IST

शासनाने १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्टÑ, अशी घोषणा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले.

ठळक मुद्देबांधकाम विभागाचा दावा : मात्र कामे निकृष्ट असल्याची ओरड

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाने १५ डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्र, अशी घोषणा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. जिल्ह्यातील विविध रस्त्यांवर पडलेले जवळजवळ ७० टक्के खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. मात्र खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत निकृष्ट आणि थातूरमातूर झाल्याची ओरड नागरिकांकडून करण्यात येत आहे.चंद्रपूर शहराला इतर गावांशी जोडणाºया रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम अतिशय जलदगतीने करण्यात आले. चंद्रपूर तालुक्यातील रस्त्यांवरील ९५ टक्के खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल येरकडे यांनी दिली. चंद्रपूर तालुक्यातील रस्त्यावरी खड्डे बुजवण्यिाचे काम जवळपास पाच टक्के काम शिल्लक आहे. तेदेखील २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या कामाचे देयके अद्याप काढण्यात आलेले नाही. तरीही अंदाजे एक कोटींचा खर्च लागणार, असेही ते म्हणाले.पोंभुर्णा तालुक्यातील प्रमुख राज्य मार्ग गोंडपिपरी ते मूल खेडी मार्गातील ५२ कि.मी. लांबी पैकी १३ कि.मी. पर्यंत पडलेले खड्डे बुजविण्यात आले. तर प्रमुख जिल्हा मार्ग ९७ कि.मी. लांब रस्त्यामधील ४१ कि.मी. पर्यंत खड्डे पडले. त्यापैकी ३६ कि.मी. खड्डे बुजविले. उर्वरित पाच कि.मी. चे खड्डे बुजविण्याचे काम शिल्लक आहे.सिंदेवाही तालुक्यात राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील संपूर्ण खड्डे बुजविण्यात आले. राज्य मार्गावरील खड्ड्याचे सिलिंग बाकी आहे. या कामासाठी बांधकाम विभागाकडे २० लाखांचा निधी असून आतापर्यंत पंधरा ते सोळा लाख रुपये खर्च झाले.राजुरा तालुक्यातील वरूर-विरूर (स्टेशन), विरूर-आर्वी, राजुरा - लक्कडकोट, राजुरा - गडचांदूर-हरदोना, चुनाळा ते अन्नुर या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. मोजमाप झाले नाही. पवनी ते कवठाडा दुरुस्ती सुरू आहे. देवाडा-सोनापूर दुरुस्ती सुरू आहे. राजुरा - सास्ती या मार्गाची दुरुस्ती पुर्ण झाली आहे.चिमूर येथील बांधकाम विभागाने संपूर्ण रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा केला आहे. चिमूर तालुका राष्ट्रीय महामार्गावर आला असल्याने उमरेड, मिसी, चिमूर ते चिमूर-शेगाव-वरोरा हा मार्ग राष्ट्रीय मार्ग झाला आहे. बांधकाम विभागांतर्गत १७९ कि.मी. रस्त्यावरील ८५.४२ कि.मी. चे खड्डे बुजविण्यात आले आहे. राज्य मार्गावरील ४६.२५ कि.मी. पर्यंतचे संपूर्ण खड्डे बुजविण्यात आले आहे.नागभीड तालुक्यात खड्डेच खड्डेनागाभीड - ब्रम्हपुरी या राष्ट्रीय महामार्गाचे फोर - वे चे काम सुरू असल्याने या मार्गाची दैनावस्था झाली आहे. येथे एकेरी वाहतूक सुरू रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. नागभीड - ब्रम्हपुरी हे २० कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे. तळोधी - बाळापूर आणि तळोधी - नेरी या राज्य महामार्गावरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. शासनाची घोषणा नागभीड तालुक्यात पोहचली नाही, असे रस्त्यांची स्थिती बघून वाटते.मूल तालुक्यात २४ लाखांचा निधी शिल्लकमूल तालुक्यात खड्डे बुजविण्याचे अजूनही जवळजवळ ३५ टक्के काम शिल्लक आहे. संपूर्ण तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ७४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मूल ते राजुली, मूल ते चामोर्शी, खेडी ते गोंडपिपरी व नांदगाव ते देवाळा या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती मूलचे उपविभागीय कार्यकारी अभियंता आर.एन. बोंदले यांनी दिली. यासाठी ५० लाख रुपये खर्च झाला असून उर्वरित २४ लाखांची कामे शिल्लक आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.डांबरीकरणाच्या रस्त्यावर चुरीचे ठिगळजिवती तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करून रस्ता दुरुस्तीचे काम केले जात आहे. मात्र कामाची गुणवत्ता आणि कामे पाहिल्यास खड्डे बुजवूनही रस्त्यावर खड्डे बघायला मिळत आहे. अनेक डांबरी रस्त्यांवर तर चक्क चुरी टाकून खड्डे बुजविल्याचे दाखविण्यात येत आहे. तालुक्यातील सहा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाली होती. त्यापैकी चार कामे पुर्ण करण्यात आली व दोन कामे प्रगतीपथावर असल्याचे बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.ब्रह्मपुरी तालुक्यात सिलिंगची कामे शिल्लकब्रह्मपुरी : राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील खड्डे बुजविण्याची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. मात्र खड्ड्यांवर सिलिंग होणे शिल्लक असल्याने निधी जैसे थे स्वरूपात आहे. राज्य मार्ग क्र. ३२२ तर २८.३० किमी वरील खड्डे बुजविले आहे. प्रमुख जिल्हा मार्ग क्र. २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४ आदी मार्गावरील ८९ कि.मी. पर्यंतच्या खड्डयांवर डांबरीकरण केले असून सिलिंग बाकी आहे. त्यासाठी चालू वर्ष व पुढील वर्षासाठी एक कोटी ७० लाख रु. मंजूर झाले आहे.