शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

वाघाच्या दहशतीत विद्यार्थ्यांची ७ कि.मी. पायपीट

By admin | Updated: February 22, 2016 01:22 IST

सावली तालुका व सिंदेवाही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सात किलोमिटरची पायपीट करून विद्यार्जन करावे लागत आहे.

पालक चिंताग्रस्त : वन विभागाने लक्ष द्यावेंसावली : सावली तालुका व सिंदेवाही तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कन्हाळगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सात किलोमिटरची पायपीट करून विद्यार्जन करावे लागत आहे. एवढेच नव्हे तर जंगलव्याप्त असलेल्या पालेबारसा कन्हाळगाव या सात कि.मी. रस्त्यावर सतत वाघाचा वावर होत असल्याने पालक चिंताग्रस्त व भयभीत झाले आहेत.कन्हाळगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी तेथील विद्यार्थ्यांना सावली तालुक्यातील पालेबारसा येथे पायी किंवा सायकलने जावे लागते. मात्र सदर सात कि.मी. च्या रस्त्यावर पाच कि.मी. परिसर संपूर्ण घनदाट जंगलाने व्याप्त आहे. तसेच या परिसरात जंगली श्वापदांचा सतत वावर असतो. सुर्दैवाने आतापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी भविष्यात कधीही धोका संभवू शकतो. या चिंतेने त्यांचे पालक भयग्रस्त होत आहेत. कधी-कधी रस्त्यांवरच व्याघ्र दर्शन होत असल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे टाळले आहे. दोन्ही तालुक्याच्या मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावर शेवटच्या टोकावर असलेले कन्हाळगाव या परिसरातील अतिशय दुर्गम गाव समजले जाते. स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानंतरही या गावात अनेक प्राथमिक सुविधांचा अभाव आहे.महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांकरिता महामंडळाच्या एस.टी.ची सुविधा केली आहे. मात्र येथील विद्यार्थी या सुविधेपासून वंचित आहेत. पालेबारसा - कन्हाळगाव या मार्गाचे खडीकरण बऱ्याच वर्षापूर्वी झाले. मात्र ठिकठिकाणी रस्ता उखडल्यामुळे सायकलस्वार व पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या ब्रिटीशकालीन आसोलामेंढा तलावाच्या पोटात या गावाचे वास्तव्य आहे. त्यामुळे जंगलातील हिंस्त्र श्वापदांचा वावर दिवसा-रात्री कधी गावाच्या शेजारी होताना दिसतो. त्यामुळे कन्हाळगाव येथील गावकरी दहशतीत जीवन जगत आहेत. या गावातील प्राथमिक सुविधांची पुर्तता करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे खुशाल लोडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)