शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; १३ जणांच्या कुटुंबीयांना मदतही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST

राजेश मडावी चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने स्वत:सह पती व चार मुलांसह ...

राजेश मडावी

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने स्वत:सह पती व चार मुलांसह दत्तपुरातील (वर्धा) मनोहर कुष्ठधामात एन्ड्रीन मिसळलेले भजे खाऊन १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्याची ही पहिली अधिकृत आत्महत्या! या घटनेला शुक्रवारी ३५ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, आत्महत्यांचे दुष्टचक्र अद्याप संपले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद का संपत आहे, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही २०२० मध्ये ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. १३ जणांच्या कुटुंबीयांना तर अद्याप मदतही मिळाली नाही.

शेतीची मशागत, पेरणी, कापणी, बियाणे, खते व कीटकनाशके विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागतात. घर चालवताना जीव मेटाकुटीला येतो. शेतीचा खर्च वाढल्याने हाती काहीच पैसे उरत नाहीत. त्यामुळे कर्ज घ्यावे लागते. त्यातही बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येतात. बऱ्याच शेतकऱ्यांकडे तारण शक्तीही नसते. आधीच्याच थकीत कर्जाने शेतकरी हैराण असतात. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता खचून जातो. तुटपुंज्या उत्पन्नामुळे शेतकरी कर्जाची परतपेड करू शकत नाही. कुटुंबाला जगण्यासाठीही पैसे लागतात. मुलांचे शिक्षण व लग्नासाठी पैसे हवेत. वरून कर्ज भरण्याचा तगादा, अशा अनेक कारणांमुळे शेतकºयांची उमेद खचते. सरकारच्या चुकीच्या आर्थिक व कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांना या नैराश्यातून मार्ग काढण्याचे पर्याय उपलब्ध होत नाही. यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दैनावस्था

चंद्रपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४० प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले. २०२० मध्ये ६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. जिल्हा समितीने केवळ २५ प्रकरणे अपात्र ठरविले. एका प्रकरणाची फेरचौकशी चौकशी सुरू आहे तर १२ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दैनावस्था सुरू आहे.