शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

वर्षभरात ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; १३ जणांच्या कुटुंबीयांना मदतही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST

राजेश मडावी चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने स्वत:सह पती व चार मुलांसह ...

राजेश मडावी

चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या चिलगव्हाण येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने स्वत:सह पती व चार मुलांसह दत्तपुरातील (वर्धा) मनोहर कुष्ठधामात एन्ड्रीन मिसळलेले भजे खाऊन १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. महाराष्ट्रातील शेतकऱ्याची ही पहिली अधिकृत आत्महत्या! या घटनेला शुक्रवारी ३५ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, आत्महत्यांचे दुष्टचक्र अद्याप संपले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जगण्याची उमेद का संपत आहे, हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही २०२० मध्ये ६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. १३ जणांच्या कुटुंबीयांना तर अद्याप मदतही मिळाली नाही.

शेतीची मशागत, पेरणी, कापणी, बियाणे, खते व कीटकनाशके विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना पैसे लागतात. घर चालवताना जीव मेटाकुटीला येतो. शेतीचा खर्च वाढल्याने हाती काहीच पैसे उरत नाहीत. त्यामुळे कर्ज घ्यावे लागते. त्यातही बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी येतात. बऱ्याच शेतकऱ्यांकडे तारण शक्तीही नसते. आधीच्याच थकीत कर्जाने शेतकरी हैराण असतात. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता खचून जातो. तुटपुंज्या उत्पन्नामुळे शेतकरी कर्जाची परतपेड करू शकत नाही. कुटुंबाला जगण्यासाठीही पैसे लागतात. मुलांचे शिक्षण व लग्नासाठी पैसे हवेत. वरून कर्ज भरण्याचा तगादा, अशा अनेक कारणांमुळे शेतकºयांची उमेद खचते. सरकारच्या चुकीच्या आर्थिक व कृषी धोरणांमुळे शेतकऱ्यांना या नैराश्यातून मार्ग काढण्याचे पर्याय उपलब्ध होत नाही. यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दैनावस्था

चंद्रपूर जिल्ह्यात २०१९ मध्ये ५७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यातील ४० प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरले. २०२० मध्ये ६९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. जिल्हा समितीने केवळ २५ प्रकरणे अपात्र ठरविले. एका प्रकरणाची फेरचौकशी चौकशी सुरू आहे तर १२ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची दैनावस्था सुरू आहे.