शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

६७ टक्के बाधित १९ ते ४० वयोगटातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते. प्रारंभी लोकांना लॉकडाऊन बरा वाटला. मात्र पुढे लॉकडाऊनचा लोकांना, विशेषता तरुण मंडळींना कंटाळा येऊ लागला. त्यामुळे नियम तोडून, आवश्यकता नसतानाही तरुण घराबाहेर पडू लागले. अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातूनही परत आले. यात कामगारांचाही समावेश होता. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून बाधितांची संख्याही वाढली. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०५ आहे.

ठळक मुद्देसात चिमुकलेही पॉझिटिव्ह : तरुणांनो, सावधान ! घराबाहेर पडू नका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. यापूर्वी बाहेर जिल्ह्यातून वा बाहेर राज्यातून आलेले व्यक्ती पॉझिटिव्ह म्हणून पुढे येत होते. मात्र आता संपर्कातूनही अनेक जण बाधित होत आहे. जिल्ह्यातील एकूण ४०५ बाधितांपैकी १९ ते ४० वयोगटातील तब्बल २७२ रुग्ण आहेत. ही टक्केवारी ६७.१६ इतकी असल्याने तरुणांनी आताच अलर्ट होणे गरजेचे झाले आहे.मार्च महिन्यापासूनच जिल्ह्यात लॉकडाऊन होते. प्रारंभी लोकांना लॉकडाऊन बरा वाटला. मात्र पुढे लॉकडाऊनचा लोकांना, विशेषता तरुण मंडळींना कंटाळा येऊ लागला. त्यामुळे नियम तोडून, आवश्यकता नसतानाही तरुण घराबाहेर पडू लागले. अनेक तरुण बाहेर जिल्ह्यातूनही परत आले. यात कामगारांचाही समावेश होता. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढून बाधितांची संख्याही वाढली. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०५ आहे.यातील ६७.१६ टक्के म्हणजेच तब्बल २७२ रुग्ण हे १९ ते ४० या वयोगटातील आहेत. यासोबतच ० ते ५ वयोगटातील सात रुग्ण आहेत. ६ ते १८ वयोगटातील २१ रुग्ण, ४१ ते ६० वयोगटातील ९३ रुग्ण आणि ६१ वर्षांवरील १२ रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले आहेत. विशेष म्हणजे संपर्कातून बाधित वाढत असल्यामुळे आता जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.बाधितांमध्ये पुरुष सर्वाधिककोरोना विषाणूचा संसर्ग लहान बालके, वयोवृध्दांनाही झाला आहे. पुरुषांसोबत महिलाही या आजाराला बळी पडल्या आहेत. २६ जुलैपर्यंतच्या एकूण बाधितांपैकी ७५ टक्के रुग्ण पुरुष आहेत. एकूण ४०५ रुग्णांपैकी ३०४ रुग्ण हे पुरुष आहेत तर १०१ रुग्ण महिला आहेत.तरुणांनो, बेफिकिरी सोडासध्या चंद्रपूर जिल्ह्यात बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी लॉकडाऊन कायम आहे. प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये थोडीफार शिथिलता दिली आहे. मात्र ही शिथिलता बाजापेठेतील कमकुवत झालेली आर्थिक उलाढाल पूर्वपदावर येण्यासाठी आहे. नागरिकांना अनावश्यक शहरात, गावात फिरण्यासाठी नाही. असे असले तरी सध्या चंद्रपूर शहरासह सर्व गावांचा विचार केला तर तरुणवर्गच सर्वाधित फिरताना दिसत आहे. आता तर संपर्कातून बाधित होण्याचे प्रकार समोर येत असल्याने तरुणांनी बेफिकिरी सोडून सरकारी नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या