शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

चंद्रपूर जिल्ह्यात एचआयव्हीचे एका वर्षात ६६२ रुग्ण

By admin | Updated: May 18, 2015 01:08 IST

मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे.

वरोरा : मागील काही वर्षांपासून एचआयव्ही होऊ नये म्हणून पुरुष व महिलांनी काळजी घ्यावी, यासाठी राष्ट्रीयस्तरावर एचआयव्ही निर्मूलन कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. असे असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात मागील एका वर्षांत ६३२ एचआयव्ही रुग्ण तपासणीमध्ये आढळून आले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी रुग्णांची संख्या कमी असल्याचे मानले जात आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात एचआयव्हीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्यामुळे मागील काही वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात एचआयव्ही निर्मूलनासाठी शासनाकडून सामाजिक संघटनांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. तसेच तालुका व ग्रामीणस्तरावरही शासकीय रुग्णालयांत तपासणी केंद्र तसेच औषधी उपचार व मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आली. गरोदर स्त्रीयांना एचआयव्ही तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. अशा चंद्रपूर जिल्ह्यातील या वर्षात ५१ हजार ८७२ स्त्री व पुरुषांची तपासणी करण्यात आली. त्यात ६३२ रुग्ण आढळून आले आहेत. यातील ६२८ रुग्णांनी औषधोपचारासाठी नोंदणी केली आहे. नियमीत औषधोपचार घेतल्यास या आजाराची तीव्रता कमी होते, याबाबत रुग्णांमध्ये औषधी उपचारासोबतच जनजागृती व मार्गदर्शन विविध केंद्रावरुन करण्यात येते. शासकीय रुग्णालयात चंद्रपूर जिल्ह्यात ४२ हजार २७८ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यात ४४ माता बाधित असल्याचे आढळून आले आहे. गरोदर माता एचआयव्हीने बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही शासकीय रुग्णालयात या मातांची प्रसूती केली जात आहे. त्यामुळे अनेक गरोदर माता उपचारासाठी तसेच प्रसूतीकरिता शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. (तालुका प्रतिनिधी)मातापिता एचआयव्ही परंतु बालके नाहीमागील काही वर्षांत माता व पित्याला एचआयव्ही असेल तर त्यांना जन्माला आलेल्या बालकांनाही एचआयव्हीची बाधा होत असे. परंतु प्रसुती अगोदरच्या तपासणीत माता व पित्याला एचआयव्ही असल्यास त्यांच्यावर औषधी उपचार करण्यात येत असल्याने अशा दाम्पत्याच्या मुलाला एचआयव्हीची बाधा होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्हमध्ये पाठपती किंवा पत्नीला एचआयव्हीची बाधा झाली असेल तर काही दिवसात दोघांनाही त्याची बाधा झाल्याचे आढळून येत होते. परंतु सध्या स्त्री व पुरुषांची तपासणी वेळीच करण्यात येते. यामध्ये एकाला बाधा असल्यास त्यांना काळजी घेण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत असल्याने सध्या पती व पत्नीमध्ये एकच पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण वाढले आहे.जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून सामाजिक संघटनाही एचआयव्ही मुक्त करण्याकरिता चांगले कार्य करीत आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागात विविध ठिकाणी तपासणी केंद्र औषध उपचार व मार्गदर्शन केंद्र उभारल्याने नागरिकांमध्ये जागृती चांगली झाल्याने दिवसागणिक एचआयव्ही बाधितांची संख्या कमी होत आहे.- सुमन पनगंटीवार, कार्यक्रम अधिकारी