शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार ४९५ रोहयो कामांवर ६२ हजार ४०८ मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहेत. या कामामुळे ग्रामीण जनतेला ...

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहेत. या कामामुळे ग्रामीण जनतेला कोरोना महामारीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ हजार ४९५ कामांवर एकूण ६२ हजार ४०८ मजुरांची उपस्थिती आहे. मजुरांच्या उपस्थितीबाबत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. काम मिळत असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

बाक्स

अशी सुरू आहेत कामे

वृक्षलागवड - २९१

जलसिंचन-०८

जमीन सुधारणा - १९

जल संधारण - ६७

पाणीसाठा नूतनीकरण - ५१

पूर नियंत्रणाची - २८

वैयक्तिक स्वरूप - ९६९

पांदण रस्ते ६१

एकूण १ हजार ४९५

बाॅक्स

१५ दिवसांत मजुरी बँकेत

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण मजुरांच्या हातचे काम गेल्याने त्यांच्या हाताला गावातच काम उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने केल्याने व केलेल्या कामांची मजुरी १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण मजूर वर्गांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात नरेगामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे मजुरांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नरेगा विभागामार्फत फळबाग लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सांगितले.

कोट

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कामांचा सेल्फ तयार करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कामाच्या ठिकाणी काेरोनाचे सर्व नियम पाळल्या जात आहेत. मास्क, सामाजिक अंतर पाळणे व सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुणे इत्यादी नियमांचे पालन केले जात आहे. पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नरेगाच्या कामावर जिल्ह्यात ठिकठिकाणी अँटिजन टेस्ट शिबिरही घेण्यात येणार आहे.

-राहुल कर्डिले,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., चंद्रपूर

०००००

३८.१५ टक्के उदिष्ट

चालू आर्थिक वर्षात एकूण ३ लक्ष १० हजार ८०७ मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शासनाकडून प्राप्त झालेले मनुष्य दिन निर्मितीचे चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट ३८.१५ लक्ष असून ते १०० टक्के पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीच्या विविध वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सतत राबविल्या जात आहे.

कोट

रोजगार हमी योजनेच्या कामामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे. गावात काही दिवसांपूर्वी कामे सुरू होती. आता पुन्हा ही कामे सुरू होणार असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.

-राकेश हिंगाने

सरपंच, कढोली बु.