शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

१ हजार ४९५ रोहयो कामांवर ६२ हजार ४०८ मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहेत. या कामामुळे ग्रामीण जनतेला ...

चंद्रपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर कामे सुरू आहेत. या कामामुळे ग्रामीण जनतेला कोरोना महामारीच्या काळात मोठा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत १ हजार ४९५ कामांवर एकूण ६२ हजार ४०८ मजुरांची उपस्थिती आहे. मजुरांच्या उपस्थितीबाबत चंद्रपूर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. काम मिळत असल्यामुळे रोजगार हमी योजनेच्या कामगारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

बाक्स

अशी सुरू आहेत कामे

वृक्षलागवड - २९१

जलसिंचन-०८

जमीन सुधारणा - १९

जल संधारण - ६७

पाणीसाठा नूतनीकरण - ५१

पूर नियंत्रणाची - २८

वैयक्तिक स्वरूप - ९६९

पांदण रस्ते ६१

एकूण १ हजार ४९५

बाॅक्स

१५ दिवसांत मजुरी बँकेत

कोरोना व लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण मजुरांच्या हातचे काम गेल्याने त्यांच्या हाताला गावातच काम उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने केल्याने व केलेल्या कामांची मजुरी १५ दिवसांच्या आत मजुरांच्या बँक खात्यात जमा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण मजूर वर्गांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना महामारीच्या काळात नरेगामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे मजुरांचे उत्पन्न वाढविण्यासाठी नरेगा विभागामार्फत फळबाग लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी सांगितले.

कोट

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर कामांचा सेल्फ तयार करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कामाच्या ठिकाणी काेरोनाचे सर्व नियम पाळल्या जात आहेत. मास्क, सामाजिक अंतर पाळणे व सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुणे इत्यादी नियमांचे पालन केले जात आहे. पुढील काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नरेगाच्या कामावर जिल्ह्यात ठिकठिकाणी अँटिजन टेस्ट शिबिरही घेण्यात येणार आहे.

-राहुल कर्डिले,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., चंद्रपूर

०००००

३८.१५ टक्के उदिष्ट

चालू आर्थिक वर्षात एकूण ३ लक्ष १० हजार ८०७ मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शासनाकडून प्राप्त झालेले मनुष्य दिन निर्मितीचे चालू आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट ३८.१५ लक्ष असून ते १०० टक्के पूर्ण करण्याचा मानस आहे. तसेच ग्रामीण भागातील आर्थिक उन्नतीच्या विविध वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सतत राबविल्या जात आहे.

कोट

रोजगार हमी योजनेच्या कामामुळे मजुरांना दिलासा मिळाला आहे. गावात काही दिवसांपूर्वी कामे सुरू होती. आता पुन्हा ही कामे सुरू होणार असल्याने मजुरांच्या हाताला काम मिळणार आहे.

-राकेश हिंगाने

सरपंच, कढोली बु.