शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

६१ कोटी ३३ लाखांचे अंदाजपत्रक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

अंदाजपत्रकात पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसल्याने विकास निधी तरतुदीत असंतुलन असून जमावबंदी आदेश रद्द झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. त्यानंतर अंदाजपत्रकातील काही तरतुदींबाबत बदल होऊ शकतो, अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. दरवर्षी मार्च महिन्यात जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकात विविध कल्याणकारी विकास योजनांसाठी जादा निधी मिळावा, यासाठी पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो.

ठळक मुद्देविकास कामांसाठी तरतूद : जमावबंदी आदेश रद्द झाल्यानंतर जि.प. च्या सर्वसाधारण सभेत होणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक खबरदारी म्हणून मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे शासनाने दिलेल्या अधिकारान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषदेचे सन २०१९-२० या वर्षाचे अंतिम सुधारित अंदाजपत्रक व सन २०२०-२१ या वर्षाच्या ६१ कोटी ३३ लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे.अंदाजपत्रकात पदाधिकाऱ्यांचा सहभाग नसल्याने विकास निधी तरतुदीत असंतुलन असून जमावबंदी आदेश रद्द झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत सादर होणार आहे. त्यानंतर अंदाजपत्रकातील काही तरतुदींबाबत बदल होऊ शकतो, अशी प्रशासकीय वर्तुळात चर्चा आहे. दरवर्षी मार्च महिन्यात जिल्हा परिषदेच्या मूळ अंदाजपत्रकात विविध कल्याणकारी विकास योजनांसाठी जादा निधी मिळावा, यासाठी पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न असतो. विषय समितीमध्ये पदाधिकारी आरूढ झाल्याने आपआपल्या विभागासाठी अंदाजपत्रकात जास्त निधी आणता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, जि. प. अध्यक्ष संध्या गुरनुले व उपाध्यक्ष रेखा कारेकार यांनी अधिकाºयांच्या बैठका घेतल्या होत्या. सदर बैठकांमध्ये अर्थसंकल्पाचे नियोजनही करण्यात आले होते. २६ मार्च रोजी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा आयोजित होती. मात्र, त्यापूर्वी संचारबंदी घोषित केल्यानंतरच नियोजित सभा रद्द झाली. त्यामुळे अर्थसंकल्प लांबणीवर जावून विकासकामांवर विपरित परिणाम होवू नये, यासाठी शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांना अर्थसंकल्प मंजूर करण्याचे अधिकार बहाल केले. त्यानुसार सीईओ राहुल कर्डिले यांनी २६ मार्च रोजी जि. प. ने सन २०२०-२१ च्या मूळ अंदाजपत्रकाला मंजुरी दिली आहे. हा अंदाजपत्रक ६१ कोटी ३३ लाखांचा असून त्यामध्ये विविध कामांसाठी तरतुदीत केल्या आहेत.कोरोनाविरूद्ध प्रतिबंधात्मक मोहीमजिल्हा परिषदेचे मूळ अंदाजपत्रक दरवर्षी २७ मार्चपूर्वी मंजूर करावे लागते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे सर्वसाधारण सभा आयोजित करता येत नसल्यामुळे हे अंदाजपत्रक मंजूर करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदांनी शासनाकडे मार्गदर्शन करण्याची विनंती केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले. जिल्हा परिषदेकडून निधीची तरतूद करून कोरोनाविरूद्ध मोहीम सुरू आहे.जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा आयोजित करून अंदाजपत्रक मंजूर होण्याची कुठलीही शक्यता दिसत नव्हती. त्यामुळे राज्य शासनाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचा मार्ग मोकळा झाला. याशिवाय जिल्ह्यातील तातडीची विकास कामे हाती घेणे शक्य झाले.- राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,चंद्रपूर

टॅग्स :zpजिल्हा परिषद