शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जीवती पंचायत समितीत ६० पदे रिक्त

By admin | Updated: January 4, 2015 23:09 IST

तालुक्यातील कोणत्याही कामाचे नियोजन, त्याची अमंलबजावणी त्या-त्या विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. परंतु जिवती तालुका हा जिल्ह्यात एकमेव तालुका असा आहे

जिवती : तालुक्यातील कोणत्याही कामाचे नियोजन, त्याची अमंलबजावणी त्या-त्या विभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. परंतु जिवती तालुका हा जिल्ह्यात एकमेव तालुका असा आहे की, येथील पंचायत समितीमध्ये विविध विभागातील एकूण ६० पदे अजूनही रिक्त आहेत. त्यामुळे या तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटचा तालुका म्हणून जिवतीची ओळख आहे. अतिमागास आणि अतिदुर्गम असलेला हा तालुका अनेक सोईसुविधांपासून अद्यापही वंचित आहे. येथील गावाचा विकास व्हावा त्यांना सोईसुविधा उपलब्ध व्हाव्या, शासकीय कामे त्वरित व्हावी, यासाठी शासनाच्या विविध विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आवश्यक असताना येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. हा तालुका अतिदुर्गम क्षेत्रात मोडतो. त्यामुळे या तालुक्यात रुजू होण्यास कर्मचारी तयार नसतात. पण त्यांना रुजू करुन घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वा पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. विकासापासून कोसो दूर असलेल्या या तालुक्यात एवढी पदे रिक्त असताना जिल्हा परिषद प्रशासन गप्प का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिवती पंचायत समितीत गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहायक पशुधन अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक बांधकाम विभाग, ज्येष्ठ सहायक, पशुधन पर्यवेक्षक, वनोपचारक, पदविधर शिक्षक, परिचर (पंचायत समिती), परिचर (पशुसंवर्धन विभाग) परिचर जि.प. बांधकाम ही पदे रिक्त आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेली ही पदे भरण्याकडे अधिकारी आणि पदाधिकारी कमालीचे दुर्लक्ष करीत आहेत. जिवतीच्या जि.प. सदस्य सुजाल भगत यांनी रिक्त असलेली पदे भरण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचा सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश मिळते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)