शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
5
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
6
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
7
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
8
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
9
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
10
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

६० ग्रामपंचायतींना मिळणार नव्या इमारती

By admin | Updated: July 23, 2016 01:30 IST

जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचा निर्णय ...

जीर्ण इमारती पाडणार : जिल्हा परिषदेच्या सभेत निर्णय चंद्रपूर : जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारती पाडून नवीन इमारती बांधण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. या निर्णयाला सभेत मंजूरी प्रदान करण्यात आली असून लवकरच निधी उपलब्ध करून ग्राम पंचायतींना नव्या इमारती बांधून देण्यात येणार आहेत. शुक्रवारी जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विरोधी सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे एका युवतीला जीव गमवावा लागला. तर चिमूर तालुक्यातील लावारीसह काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका कर्तव्य बजावत नसल्याची तक्रार सतीश वाजूरकर यांनी केली होती. त्यावरही कारवाई करण्यात आली नाही. पण, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याने विरोधक आक्रमक होते. काही दिवसांपुर्वी संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायतींची पाहणी केली. या पाहणीत ६० ग्रामपंचायतीच्या इमारती जीर्ण असल्याचा अहवाल पंचायत विभागाला पाठविला होता. तसेच त्या क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांनीही इमारतींची समस्या जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांच्याकडे मांडली होती. त्यामुळे शुक्रवारच्या विशेष सभेत याा विषयावर चर्चा झाली व ६० ग्रामपंचायती पाडण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. नव्या इमारतींसाठी निधी उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश, जि. प. अध्यक्ष गुरूनुले यांनी पंचायत विभागाला दिले आहेत. यासोबतच जनावरांच्या आजारावर तातडीने उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय संस्था, पशुवैद्यकीय रुग्णालयांना तातडीने औषध पुरवठा करण्यासाठी ७५ लाखांचा निधी खर्च करण्याची मंजूरी प्रदान करण्यात आली. यासोबत ब्रह्मपुरी तालुक्यातील नान्होरी, सिंदेवाही तालुक्यातील शिवणी, गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथे नवे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी) दोन तासात गुंडाळली सभा : अहीरकर सभा सुरू असताना वीज गेल्याने वीज येण्याची प्रतीक्षा न करता, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी सभा दोन तासात गुंडाळण्याचा विक्रम केला. गैरव्यवहारावर चर्चा होवू नये म्हणून जि. प. अध्यक्षांच्या सांगण्यानुसार जाणीवपुर्वक वीज पुरवठा बंद करण्यास आला, असा आरोप काँग्रेसचे जि. प. उपगटनेता विनोद अहीरकर यांनी केला आहे. अध्यक्षांच्या कार्यपद्धतीने सर्व जि. प. सदस्य नाराज असून ३ महिन्यातून एकाच होणाऱ्या सभेत केवळ गैरव्यवहार लपविण्यासाठी सभा गुंडाळून टाकणे चुकीचे असून तातडीने पुन्हा सभा बोलवावी, असे विनोद अहीरकर यांनी म्हटले आहे.