शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दहा महिन्यात ५७ रूग्णांना डेंग्यूचा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:13 IST

तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देतीन रूग्ण दगावले : उपचार होणारे रूग्ण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : तालुक्यात डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्याच्या कालावधीत डेंग्यूच्या रूग्णांची संख्या ५७ वर पोहचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचे प्रमाण जास्त आहे.तालुक्याबाहेर खासगी दवाखाण्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्याही अधिक असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागच्या वर्षी ६७ डेंग्यू रक्तजल नमूने घेण्यात आले होते. त्यापैकी एका रूग्णांचा मृत्यू झाला. यावर्षी जानेवारी ते आॅक्टोबर या दहा महिन्यांत २१३ डेंग्यू रक्त तपासणी झाली. त्यात ५७ जणांना लागण झाल्याचे आढळून आले असून तीन रूग्ण दगावले आहे.स्क्र ब टायफसच्या रूग्णांतही वाढवातावरणातील बदलामुळे यावर्षी किटकजन्य आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे स्क्र ब टायफससारख्या नवीन आजारालाही समोर जावे लागले. याबाबतची माहिती खासगी रूग्णालयातून मिळत असली तरी त्याची नोंद मात्र शासन दरबारी नाही.ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्षसध्या हागणदारीमुक्त गाव व स्वच्छता अभियान राबवून गाव स्वच्छ व निर्मल करण्याचे हाती घेतले असले तरी ग्रामपंचायतच्या उदासीन धोरणामुळे योजनेचे तीनतेरा वाजत आहे. नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, स्क्रॅब टायफस यासारख्या जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. असे आजार नागरिकांना होऊ नये, यासाठी प्रत्येक गाव व परिसरासाठी काही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तरी त्याचा फायदा होताना दिसत नाही. आजही ग्रामीण भागात शौचालयाला उघड्यावरच बसताना दिसत आहे. ग्रामपंचायत नोटीस बजावून सांगत असतानासुद्धा नागरिक जुमानत नाही.