शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

५०३ दुष्काळसदृश गावांना मिळणार सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:59 IST

दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त तालुक्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरारसरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी....

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त तालुक्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरारसरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिमीपेक्षा कमी असलेल्या महसूली मंडळातील गावांना दुष्काळ घोषित करून विविध सवलती लागू केल्या. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५०३ गावांतील शेतकºयांना विविध सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.दृष्काळसदृश परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य शासनाला अहवाल पाठविण्यात आला होता. या अहवालानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्जन्यमान ७५० मिमी पेक्षा कमी झालेल्या महसूली मंडळातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या राज्यातील ९३१ गावांना दुष्काळ सदृश म्हणून घोषित करण्यात आले होते.८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी व अद्यापही दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर न केलेल्या अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या उर्वरीत ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली.यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ५०३ गावांचा समावेश आहे. अशा गावांना आठ सवलती लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.गुरूवारी शासनाने मंजुरी प्रदान केली. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.कार्यवाहीचा अनुपालन अहवाल अर्थ विभागाला सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांना देण्यात आला.दुष्काळसदृश गावांमध्ये उपाययोजना अंमलात आणण्याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.अशा आहेत सवलतीजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये कृषी पंपाची वीज जोडणी खंडित करण्यास मनाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी