शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

५०३ दुष्काळसदृश गावांना मिळणार सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:59 IST

दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त तालुक्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरारसरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी....

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन राज्य शासनाने दुष्काळ घोषित केला. या व्यतिरिक्त तालुक्यातील ज्या महसूली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत तालुक्याच्या सरारसरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मिमीपेक्षा कमी असलेल्या महसूली मंडळातील गावांना दुष्काळ घोषित करून विविध सवलती लागू केल्या. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार जिल्ह्यातील ५०३ गावांतील शेतकºयांना विविध सवलतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.दृष्काळसदृश परिस्थितीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य शासनाला अहवाल पाठविण्यात आला होता. या अहवालानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत एकूण पर्जन्यमान ७५० मिमी पेक्षा कमी झालेल्या महसूली मंडळातील ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या राज्यातील ९३१ गावांना दुष्काळ सदृश म्हणून घोषित करण्यात आले होते.८ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी व अद्यापही दुष्काळ किंवा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर न केलेल्या अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या उर्वरीत ४ हजार ५१८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झाली.यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ५०३ गावांचा समावेश आहे. अशा गावांना आठ सवलती लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.गुरूवारी शासनाने मंजुरी प्रदान केली. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा.कार्यवाहीचा अनुपालन अहवाल अर्थ विभागाला सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हाधिकाºयांना देण्यात आला.दुष्काळसदृश गावांमध्ये उपाययोजना अंमलात आणण्याकरिता प्राधिकृत अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.अशा आहेत सवलतीजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ केले जाणार आहे. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता देण्यात येईल. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये कृषी पंपाची वीज जोडणी खंडित करण्यास मनाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी