शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

५०० एलईडी पथदिवे फुस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:10 IST

शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमहानगरात नाराजी : त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.महानगरपालिकेने शहरातील सर्वच प्रभागांमध्ये एलईडी पथदिवे लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या दिव्यांचा प्रकाश उत्तम असतो शिवाय वीज बीलही कमी येते. मनपाच्या सभेत हा विषय मांडल्यानंतर उपस्थित सर्वच नगरसेवकांनी संमती प्रदान केली होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी एलईडी दिव्यांची खरेदी करण्यात आली. नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये हे पथदिवे लावण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खांबांवर पथदिवे लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु, काही प्रभागांतील सुमारे ५०० पथदिवे अचानक बंद झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अशास्थितीत प्रभागात भरपूर उजेड देणारे पथदिवे सुरू ठेवणे गरजेचे आहे़ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे़ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाने अनेक योजना सुरू केल्या़ एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णयदेखील याच धोरणांचा परिपाक असल्याचे नागरिक सांगतात़ नुकतेच पार पडलेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही नगरसेवकांनी एलईडी पथदिव्यांची समस्या मांडली. पावसाळ्यात पथदिवे बंद ठेवणे चुकीचे आहे़ विविध प्रभागातील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.आता ‘त्या’ नगरसेवकांचेही दुर्लक्षमनपाने एलईडी पथदिवे लावल्यानंतर काही नगरसेवकांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. प्रभागातील चौकामध्ये बॅनर लावून आपण किती जागरूक आहोत, याचेही दर्शन घडविले. विकास कामांची यादीही बॅनरवर झळकविली. परंतु, एलईडी पथदिवे बंद झाल्याने नगरसेवकांना आता नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत.