शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

५०० एलईडी पथदिवे फुस्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:10 IST

शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देमहानगरात नाराजी : त्वरीत दुरूस्त करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील विविध वॉर्डांमध्ये महानगरपालिकेने दीड हजार एलईडी पथदिवे एक महिन्यापूर्वी लावले होते. यातील सुमारे ५०० पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.महानगरपालिकेने शहरातील सर्वच प्रभागांमध्ये एलईडी पथदिवे लावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. या दिव्यांचा प्रकाश उत्तम असतो शिवाय वीज बीलही कमी येते. मनपाच्या सभेत हा विषय मांडल्यानंतर उपस्थित सर्वच नगरसेवकांनी संमती प्रदान केली होती. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी एलईडी दिव्यांची खरेदी करण्यात आली. नगरसेवकांच्या मागणीप्रमाणे शहरातील सर्वच वॉर्डांमध्ये हे पथदिवे लावण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच खांबांवर पथदिवे लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतु, काही प्रभागांतील सुमारे ५०० पथदिवे अचानक बंद झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. अशास्थितीत प्रभागात भरपूर उजेड देणारे पथदिवे सुरू ठेवणे गरजेचे आहे़ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील तर त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे़ शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाने अनेक योजना सुरू केल्या़ एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णयदेखील याच धोरणांचा परिपाक असल्याचे नागरिक सांगतात़ नुकतेच पार पडलेल्या मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत काही नगरसेवकांनी एलईडी पथदिव्यांची समस्या मांडली. पावसाळ्यात पथदिवे बंद ठेवणे चुकीचे आहे़ विविध प्रभागातील अंधार दूर करण्यासाठी पथदिवे तातडीने सुरू करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.आता ‘त्या’ नगरसेवकांचेही दुर्लक्षमनपाने एलईडी पथदिवे लावल्यानंतर काही नगरसेवकांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. प्रभागातील चौकामध्ये बॅनर लावून आपण किती जागरूक आहोत, याचेही दर्शन घडविले. विकास कामांची यादीही बॅनरवर झळकविली. परंतु, एलईडी पथदिवे बंद झाल्याने नगरसेवकांना आता नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत.