शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वन शहीद आत्राम यांच्या कुटुंबाला ५० लक्षांची मदत, वनमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने भारावले कर्मचारी

By राजेश भोजेकर | Updated: September 21, 2023 15:15 IST

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने योजनेचा मिळणार लाभ

चंद्रपूर : शासकीय योजना गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत, अशी ओरड नेहमीच होत असते. पण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या संवेदनशील कृतीतून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबाला वनविभागातील योजनेतून २५ लक्ष रुपयांची मदत दिल्यानंतर शासनाच्या वन शहीद योजनेतून आणखी २५ लक्ष रुपयांची मदत होणार आहे. त्यांच्यातील या संवेदनशीलतेने वन कर्मचारी देखील भारावले आहेत. विशेष म्हणजे वनशहीद योजनेसंदर्भात संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रातच अशाप्रकारचे शासनादेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा/देसाईगंज वनविभागात कार्यरत वाहन चालक सुधाकर बापूराव आत्राम यांच्यावर १६ सप्टेंबर रोजी आरमोरी वन परीक्षेत्रात रानटी हत्तीच्या कळपाने हल्ला केला होता. यात आत्राम यांचा मृत्यू झाला. शासन निर्णयानुसार, एखाद्या वन कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला २५ लक्ष रुपयांची मदत करण्यात येते. त्यानुसार ना. मुनगंटीवार यांनी वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबियांना तातडीने २५ लक्ष रुपयांची मदत केली. 

आपल्या विभागातील एक कर्मचारी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्यावर त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आणखी काय करता येईल या विचारात ना. मुनगंटीवार होते. वन शहीद पाल्यास १८ वर्षे पूर्ण झाल्यास वनविभागात नोकरी देण्यात येईल. तोपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. पाल्याला नोकरी मिळेपर्यंत वेतन किंवा पेन्शन देण्याचे नियोजन केले जाईल. हे सारे निश्चित असतानाही ना. मुनगंटीवार यांना आत्राम कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणखी काहीतरी करावे असे वाटत होते. त्यांनी विविध सरकारी योजनांचा पुन्हा एकदा आढावा घेतला आणि वनशहीद योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त २५ लक्ष रुपयांची मदत करण्याचे वनविभागाला निर्देश दिले. 

शासन आदेशांनुसार वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वन कर्मचाऱ्याला २५ लाख रुपयांची मदत करण्याची तरतूद आहे. ना. मुनगंटीवार यांनी तातडीने यासंदर्भात त्यांच्या कुटुंबाला २५ लक्ष रुपयांचा धनादेश दिला. लवकरच वनशहीद या योजनेतून अतिरिक्त २५ लाख रुपयांची मदत आत्राम कुटुंबाला करण्यात येणार आहे. 

वनमंत्री यांचे विशेष लक्ष्य

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये वनविभाग वन्य प्राण्यांची संख्या वाढवण्यामध्ये भर देत आहे. संख्यात्मक वाढ करण्यासोबतच त्या अनुषंगाने होणारे अपघात त्याकडेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष लक्ष आहे.

‘असा वनमंत्री बघितला नाही’

वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. एरव्ही पीडित कुटुंबालाच सरकार दरबारी चकरा माराव्या लागतात. पण इथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांच्या तोंडून ‘असा वनमंत्री बघितला नाही’, अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया बाहेर पडली आहे.

फक्त महाराष्ट्रात असा शासन आदेश

संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र राज्याने वन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भात महत्त्वाची तरतूद केली आहे. वन शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे शासनादेश काढण्यात आले आहेत. १२ ऑक्टोंबर २०२२ मध्ये हे शासनादेश जाहीर झाले नसते तर कदाचित स्व. आत्राम यांच्या कुटुंबाला ही मदत होऊ शकली नसती. त्यामुळे मुनगंटीवार यांना याचे श्रेय देण्यात येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-acचंद्रपूर