शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

वन शहीद आत्राम यांच्या कुटुंबाला ५० लक्षांची मदत, वनमंत्र्यांच्या संवेदनशीलतेने भारावले कर्मचारी

By राजेश भोजेकर | Updated: September 21, 2023 15:15 IST

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने योजनेचा मिळणार लाभ

चंद्रपूर : शासकीय योजना गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत, अशी ओरड नेहमीच होत असते. पण राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या संवेदनशील कृतीतून साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबाला वनविभागातील योजनेतून २५ लक्ष रुपयांची मदत दिल्यानंतर शासनाच्या वन शहीद योजनेतून आणखी २५ लक्ष रुपयांची मदत होणार आहे. त्यांच्यातील या संवेदनशीलतेने वन कर्मचारी देखील भारावले आहेत. विशेष म्हणजे वनशहीद योजनेसंदर्भात संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रातच अशाप्रकारचे शासनादेश आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा/देसाईगंज वनविभागात कार्यरत वाहन चालक सुधाकर बापूराव आत्राम यांच्यावर १६ सप्टेंबर रोजी आरमोरी वन परीक्षेत्रात रानटी हत्तीच्या कळपाने हल्ला केला होता. यात आत्राम यांचा मृत्यू झाला. शासन निर्णयानुसार, एखाद्या वन कर्मचाऱ्याला कर्तव्यावर असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला २५ लक्ष रुपयांची मदत करण्यात येते. त्यानुसार ना. मुनगंटीवार यांनी वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबियांना तातडीने २५ लक्ष रुपयांची मदत केली. 

आपल्या विभागातील एक कर्मचारी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्यावर त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आणखी काय करता येईल या विचारात ना. मुनगंटीवार होते. वन शहीद पाल्यास १८ वर्षे पूर्ण झाल्यास वनविभागात नोकरी देण्यात येईल. तोपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल. पाल्याला नोकरी मिळेपर्यंत वेतन किंवा पेन्शन देण्याचे नियोजन केले जाईल. हे सारे निश्चित असतानाही ना. मुनगंटीवार यांना आत्राम कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी आणखी काहीतरी करावे असे वाटत होते. त्यांनी विविध सरकारी योजनांचा पुन्हा एकदा आढावा घेतला आणि वनशहीद योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त २५ लक्ष रुपयांची मदत करण्याचे वनविभागाला निर्देश दिले. 

शासन आदेशांनुसार वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वन कर्मचाऱ्याला २५ लाख रुपयांची मदत करण्याची तरतूद आहे. ना. मुनगंटीवार यांनी तातडीने यासंदर्भात त्यांच्या कुटुंबाला २५ लक्ष रुपयांचा धनादेश दिला. लवकरच वनशहीद या योजनेतून अतिरिक्त २५ लाख रुपयांची मदत आत्राम कुटुंबाला करण्यात येणार आहे. 

वनमंत्री यांचे विशेष लक्ष्य

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये वनविभाग वन्य प्राण्यांची संख्या वाढवण्यामध्ये भर देत आहे. संख्यात्मक वाढ करण्यासोबतच त्या अनुषंगाने होणारे अपघात त्याकडेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष लक्ष आहे.

‘असा वनमंत्री बघितला नाही’

वन शहीद सुधाकर आत्राम यांच्या कुटुंबासाठी सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार एक दुर्मिळ घटना मानली जात आहे. एरव्ही पीडित कुटुंबालाच सरकार दरबारी चकरा माराव्या लागतात. पण इथे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांच्या तोंडून ‘असा वनमंत्री बघितला नाही’, अशी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया बाहेर पडली आहे.

फक्त महाराष्ट्रात असा शासन आदेश

संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र राज्याने वन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासंदर्भात महत्त्वाची तरतूद केली आहे. वन शहिदांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे शासनादेश काढण्यात आले आहेत. १२ ऑक्टोंबर २०२२ मध्ये हे शासनादेश जाहीर झाले नसते तर कदाचित स्व. आत्राम यांच्या कुटुंबाला ही मदत होऊ शकली नसती. त्यामुळे मुनगंटीवार यांना याचे श्रेय देण्यात येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-acचंद्रपूर