शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाच लाख सातबारांचे संगणीकरण

By admin | Updated: July 6, 2014 23:51 IST

राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणीकरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १ आॅगस्टपासून हस्तलिखित सातबारा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र

चंद्रपूर : राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १० हजार ६४१ सातबाराचे संगणीकरण्याचे काम अंतिम टप्प्यात असून १ आॅगस्टपासून हस्तलिखित सातबारा बंद करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने आखले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सातबारा संगणकीकृत देण्याचा पुढाकार जिल्हा प्रशासनाने घेतला असून कोरपना तालुक्यात १५ जुलै पासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी सर्व तलाठ्यांना देण्यासाठी लॅपटॉप उपलब्ध आहेत.भूमिअभिलेखाचे जतन करण्यासाठी अभिलेख स्कॅनिग कार्यक्रम राबविला जाणार असून पहिल्या टप्प्यात मूल, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, चंद्रपूर या तालुक्यातील अभिलेख स्कॅनिंग करण्यात येणार आहे. उर्वरीत तालुक्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा निश्चय करण्यात आला आहे. जिल्ह्यात १९ लाख ९५ हजार अभिलेखे असून या सर्वाचे स्कॅनिंग करण्यात येणार आहे. आता आॅनलाईन फेरफार मिळणार असून यासाठी जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व म्युटेशनचे कर्मचारी अशा एकूण २२४ डिजिटल स्वाक्षरी करुन संबंधितांना वितरीत करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर तालुक्यातील १०३ गावांमध्ये ३८५३८ साताबारा, बल्लारपूर ३५ गावात ८६०६, मूल १११ गावात ३५७४८, सावली ११८ गावात ४६१५३, पोंभुर्णा ७१ गावात १९३६५, गोंडपिपरी ९८ गावात २५१३९, वरोरा १८४ गावात ४२०००, भद्रावती १६४ गावात ३४७८५, चिमूर २६९ गावात ५२७९३, नागभीड १३८ गावात ४७०४६, सिंदेवाही ११५ गावात ४४०२६, ब्रह्मपुरी १४० गावात ५५३५३, राजुरा १११ गावात २९२२१, कोरपना ११३ गावात २०४१९ व जिवती ८३ गावात ११४५१ अशी एकूण १८३६ गावामध्यो ५ लाख १० हजार ६४३ सातबाराची संख्या आहे. सातबाराच्या आधुनिकरणाचे काम युद्धस्तरावर सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. हस्तलिखित सातबारा देणे बंद करण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स सातबारा देण्यासाठी जिल्ह्यातील २८४ तलाठी व ३७ मंडळ अधिकाऱ्यांसाठी लॅपटॅप उलब्ध आहेत. यासोबतच डाटा कार्डही पूरविण्यात येणार आहे.जिल्ह्यात भूमिअभिलेख आधुनिकरण कार्यक्रमाअंतर्गत इ- फेरफार या आज्ञानवलीची अंमलबजावणी करण्याचे काम प्रगतीपथावर असून १५ तालुक्यांमध्ये डाटा करेक्शन तसेच डाटा अपडेशनचे काम अंतिम टप्प्यात आहेत. कोरपना तालुक्यातील काम पूर्ण झाले असून सातबाराचे प्रिन्ट तलाठ्याकडून तपासले आहे. या ठिकाणी १५ जुलैपासूनच हस्तलिखित सातबारा देण्याचे काम बंद करण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)