शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४० कोटी परत करावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

चंद्रपूर जिल्हा परिषदेला २०१९-२० वर्षात प्राप्त निधीपैकी ४० कोटींचा निधी मार्च एन्डींगच्या आधी खर्च करता आला नाही. त्यामुळे हा निधी अखर्चित राहिला आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाने विकासकांमासाठी दिलेल्या निधीत ६७ टक्क्यांची कपात केली. यापूर्वी अखर्चित निधी पुढील वर्षात मंजूर कामांसाठी खर्च करण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जात होता. मात्र, सध्या राज्याची अर्थव्यवस्थाच खिळखिळी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेवर नामुष्की : ३१ मे पर्यंत डेडलाईन, निधी अखर्चित ठेवणे भोवले

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाकडून विकास कामांसाठी मिळालेला सुमारे ४० कोटींचा निधी खर्च करण्यास दुर्लक्ष झाल्याने जिल्हा परिषदेला ३१ मे २०२० पूर्वी राज्य शासनाला परत करावा लागणार आहे.विशेष म्हणजे विविध विभाग व त्यांच्या अधिनस्थ कार्यालयतंर्गत स्वीय प्रपंची खात्यातील रक्कम वित्त विभागाच्या परवागनीविना काढण्यास मनाई केल्याने जिल्हा परिषदेची विकास कामांसाठी अर्थकोंडी होणार आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेला २०१९-२० वर्षात प्राप्त निधीपैकी ४० कोटींचा निधी मार्च एन्डींगच्या आधी खर्च करता आला नाही. त्यामुळे हा निधी अखर्चित राहिला आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकाने विकासकांमासाठी दिलेल्या निधीत ६७ टक्क्यांची कपात केली. यापूर्वी अखर्चित निधी पुढील वर्षात मंजूर कामांसाठी खर्च करण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जात होता. मात्र, सध्या राज्याची अर्थव्यवस्थाच खिळखिळी झाली आहे.त्यामुळे ४ मे २०२० च्या आदेशानुसार जिल्हा परिषदेला २०१९-२० वर्षातील अखर्चित निधी २०२०-२१ मध्ये खर्च करण्याचा विषयच संपूष्टात आणला आहे. विकास कामांसाठी विविध विभाग आणि जिल्हा नियोजन मंडळाकडूनही दरवर्षी कोट्यवधींचा निधी मिळतो. मात्र, हा अखर्चित निधी मंजूर कामांवर खर्च करण्याकडे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. परिणामी, विकास कामांचा शिल्लक निधी ३१ मार्च २०२० पूर्वी शासनाला समर्पित करण्याच्या सूचना धडकल्याने कार्यवाही सुरू झाली आहे.कपातीनंतरच्या तरतुदीतूनच भागवा खर्चविभागप्रमुखांनी स्वीय प्रपंची खात्यातील पुढील तीन महिन्यांची आर्थिक गरज वित्त विभागाला आधी कळविल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही. सदर खात्यातील रक्कम त्या मर्यादेतच वितरीत होईल. विभागांनी बँक खात्यातील उपलब्ध निधी पूर्ण खर्च केल्याशिवाय स्वीय प्रपंची खात्यातील रक्कम काढता येणार नाही. शिवाय चालू वित्तीय वर्षातील निधी वितरीत करू नये. २०१९-२०२० या वर्षातील प्रलंबित देयके २०२०-२०२१ वर्षाच्या उपलब्ध तरतुदीतून भागविता येईल. परंतु, हा खर्चही कपातीनंतर उपलब्ध तरतुदीतूनच भागविण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे निधी अखर्चित ठेवण्याचा हलगर्जीपणा जिल्हा परिषदेला भोवण्याची शक्यता आहे.फक्त आरोग्य विभागालाच मिळणार निधीकृषी, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा व स्वच्छता, समाजकल्याण, आरोग्य, बांधकाम, महिला व बाल विकास तसेच शिक्षण विभागातील मंजूर निधी मार्चपूर्वी खर्च करण्याकडे लक्ष दिले नाही. कोरोनामुळे केवळ आरोग्य योजनांसाठी राज्याकडून निधी मिळू शकेल. मात्र, व्यक्तीगत व सामूहिक विकास योजना अंमलात आणताना जिल्हा परिषदेची दमछाक होऊ शकते.अखर्चित निधीसंदर्भात माहिती संकलनाचे काम सुरू आहे. ३१ मे २०२० पूर्वी राज्य सरकारला निधी परत करावा लागणार आहे. २०१९-२० वर्षातील निधी अखर्चित राहिला. काही रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित आहे. मात्र यापूर्वीच्या मंजूर कामांसाठी निधीची अडचण भासणार नाही. यापुढे आरोग्य विभागाचा अपवाद सोडून नवीन कोणतीही कामे करता येणार नाही.- अशोक मातकर, लेखा व वित्त अधिकारी जि. प. चंद्रपूर.

टॅग्स :zpजिल्हा परिषद