शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

४ कोटींचा खर्च; तरीही विद्यार्थिनींचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:25 IST

शासनाच्या महत्त्वाकांक्षी मानव विकास मिशन उपक्रमातंर्गत राज्यभरात विद्यार्थिनींसाठी बसगाड्या सुरू करण्यात आल्या.

एसटी महामंडळाचा कारभार : विद्यार्थिनींच्या बसमध्ये अन्य प्रवाशांची वाहतूकलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनाच्या महत्त्वाकांक्षी मानव विकास मिशन उपक्रमातंर्गत राज्यभरात विद्यार्थिनींसाठी बसगाड्या सुरू करण्यात आल्या. मात्र या बसगाड्यांमधून विद्यार्थिनी कमी आणि प्रवाश्यांचीच अधिक वाहतूक केली जात आहे. मानव विकास मिशन अंतर्गत जिल्हाभरात ७७ बसगाड्या आरक्षीत असून विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी एसटी महामंडळाला डिझेल खर्च म्हणून एका बसमागे वार्षिक ६ लाख रूपये असे ४ कोटी ४२ लाख रूपये दरवर्षी दिले जात आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या मुजोरीने विद्यार्थिनी कमी आणि प्रवाश्यांचीच जास्त वाहतूक होत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथे बसमध्ये उभ्याने प्रवास करणारी विद्यार्थिनी दारावर उभी असताना धावत्या बसमधून खाली पडल्याची घटना आठ दिवसांपुर्वी घडली. या घटनेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मानव विकास मिशनच्या बसगाड्यांमध्ये विद्यार्थिनींनाच बसण्यासाठी सीट मिळत नाही, असे बरेचदा घडते. बसमध्ये विद्यार्थिनींना प्रथम स्थान देण्यात आले असले तरी अनेक प्रवासी विद्यार्थिनींना बसण्यासाठी जागा देत नाही. त्यामुळे सावित्रीच्या लेकींना उभ्याने प्रवास करावा लागत आहे. शासनाच्या निर्देशानुसार मानव विकास मिशनच्या बसगाड्यांद्वारे शालेय वेळात फक्त विद्यार्थिनींची वाहतूक करणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. शालेय वेळात येणार बसगाडी ही इतर प्रवाशांनी गच्च भरून असते. अशावेळी एकच बसगाडी असल्यास विद्यार्थिनी त्याच बसने उभ्याने प्रवास करतात. बसचा वाहकही विद्यार्थिनींना सीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न न करता दमदाटी करताना दिसून येतात. त्यामुळे विद्यार्थिनींच्या अडचणी वाढल्या असून याकडे वेळीच लक्ष देऊन केवळ विद्यार्थ्यांसाठी बसगाडी सोडण्याची मागणी पालकांकडून होत आहे. नियम डावलून जिल्हाअंतर्गत वाहतूक शासनाच्या निर्देशानुसार मानव विकास मिशनच्या एका बसने दिवसभरात कमीत कमी १२० विद्यार्थिनींची वाहतूक करणे आवशक्य आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. तसेच मानव विकास मिशनच्या बसने शाळेला सुट्टी असण्याच्या दिवशी वगळून इतर दिवशी जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक करू नये, असे म्हटले आहे. मात्र या बसगाड्यांद्वारे सर्रासपणे जिल्हातंर्गत वाहतूक केली जाते. याबाबत वारंवार नोटीस पाठवूनही एसटी महामंडळ दखल घेत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २५३ शाळांच्या सहा हजार विद्यार्थिनीमानव विकास मिशन अंतर्गत यावर्षी पासचे वाटप सुरू असून अद्याप आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र गतवर्षी जिल्ह्यात ६ हजार १९९ विद्यार्थिनींनी या योजनेतून शालेय प्रवास केला. मानव विकास मिशन योजनेत पंधरा तालुक्यातील ६१८ गावांचा समावेश असून २५३ बसफेरीत समाविष्ठ शाळा आहेत. बसगाडी केवळ विद्यार्थिनींसाठी असली तरी बसमध्ये चढलेल्या इतर प्रवाशाला उतरविण्याची हिमंत चालक व वाहक करू शकत नाही. अनेक गावांमध्ये एकच बसफेरी असते. एसटी महामंडळाकडे कर्मचारी, चालक व वाहकांची कमतरता आहे. केवळ विद्यार्थिनींसाठी बसफेऱ्या सुरू करण्यास अडचणी आहेत. मानव विकासच्या बसगाड्यांमध्ये विद्यार्थिनींना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गांगलवाडी घटनेची चौकशी सुरू आहे. - निलेश बेलसरे विभागीय वाहतूक अधिकारी, चंद्रपूर