शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

स्थानिक स्वराज्य संस्थेचे ३९ कोटी रुपये परत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

नगरपरिषद, नगरपंचायत, चंद्रपूर महानगरपालिकेला विकासाकरिता राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ता निधी, पर्यटन, अनुदान, नगरपंचायतींना विशेष अनुदान आदी विविध योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. निवडणूक आचार संहीता लागण्यापूर्वी लगभगीने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाकडे निधी आला.

ठळक मुद्देवर्क आर्डरला स्थगिती : बल्लारपूर, मूल, वरोरासह महानगरपालिकेला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मागील सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका व नगर पंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. या निधीतील काही कामांच्या निविदा निघाल्या. परंतु वर्कआर्डर थांबविण्याचे आदेश नव्या सरकारने दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ३९ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नगरपरिषद, नगरपंचायत, चंद्रपूर महानगरपालिकेला विकासाकरिता राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ता निधी, पर्यटन, अनुदान, नगरपंचायतींना विशेष अनुदान आदी विविध योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. निवडणूक आचार संहीता लागण्यापूर्वी लगभगीने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाकडे निधी आला. या निधीतून तातडीने कामे मंजुर करुन चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकांने विकास कामांचे उद्घाटनही उरकले. उर्वरित निधी आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकार स्थापण्याकरिता विलंब झाला. काही दिवस राष्टÑपती राजवट राज्यात लागू झाली. त्यामुळे निधीचे नियोजन करताच आले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ३९ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला. जिल्ह्यात सर्वाधिक निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेनुसार खर्च करण्यात आल्याची ओरडही झाली होती. परंतु शहराचा विकास होत असल्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण आणले नाही. मात्र त्यानंतर नव्या सरकारने सन २०१९-२० या वर्षामध्ये शिल्लक असलेल्या निधीमधील कामाचे वर्क आर्डर थांबविण्याचे आदेश दिल्याने सदर निधी परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.निधी परत जाण्याचा सर्वाधिक फटका चंद्रपूर महानगरपालिका, बल्लारपूर, मूल, वरोरा या नगरपालिकांना सर्वाधिक बसल्याचे समजले असून आता स्थानिक पदाधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवून हातवर करीत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.नव्या शासनाचा हा निर्णय चुकीचा आहे. विदर्भातील स्थानिक विकास स्वराज्य संस्थेकडे मोठ्या प्रमाणात निधी आला होता. सदर निर्णयाने विकास कामात अडथळा होणार असून याबाबत दाद मागणार.- अहेतेश्याम अली,नगराध्यक्ष, वरोरा