शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थेचे ३९ कोटी रुपये परत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

नगरपरिषद, नगरपंचायत, चंद्रपूर महानगरपालिकेला विकासाकरिता राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ता निधी, पर्यटन, अनुदान, नगरपंचायतींना विशेष अनुदान आदी विविध योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. निवडणूक आचार संहीता लागण्यापूर्वी लगभगीने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाकडे निधी आला.

ठळक मुद्देवर्क आर्डरला स्थगिती : बल्लारपूर, मूल, वरोरासह महानगरपालिकेला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मागील सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका व नगर पंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. या निधीतील काही कामांच्या निविदा निघाल्या. परंतु वर्कआर्डर थांबविण्याचे आदेश नव्या सरकारने दिल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ३९ कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नगरपरिषद, नगरपंचायत, चंद्रपूर महानगरपालिकेला विकासाकरिता राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला होता. वैशिष्ट्यपूर्ण विशेष रस्ता निधी, पर्यटन, अनुदान, नगरपंचायतींना विशेष अनुदान आदी विविध योजने अंतर्गत निधी मंजूर करण्यात आला. निवडणूक आचार संहीता लागण्यापूर्वी लगभगीने चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाकडे निधी आला. या निधीतून तातडीने कामे मंजुर करुन चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकांने विकास कामांचे उद्घाटनही उरकले. उर्वरित निधी आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकार स्थापण्याकरिता विलंब झाला. काही दिवस राष्टÑपती राजवट राज्यात लागू झाली. त्यामुळे निधीचे नियोजन करताच आले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेकडे ३९ कोटी रुपयांचा निधी शिल्लक राहिला. जिल्ह्यात सर्वाधिक निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या योजनेनुसार खर्च करण्यात आल्याची ओरडही झाली होती. परंतु शहराचा विकास होत असल्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण आणले नाही. मात्र त्यानंतर नव्या सरकारने सन २०१९-२० या वर्षामध्ये शिल्लक असलेल्या निधीमधील कामाचे वर्क आर्डर थांबविण्याचे आदेश दिल्याने सदर निधी परत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.निधी परत जाण्याचा सर्वाधिक फटका चंद्रपूर महानगरपालिका, बल्लारपूर, मूल, वरोरा या नगरपालिकांना सर्वाधिक बसल्याचे समजले असून आता स्थानिक पदाधिकारी एकमेकांकडे बोटे दाखवून हातवर करीत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.नव्या शासनाचा हा निर्णय चुकीचा आहे. विदर्भातील स्थानिक विकास स्वराज्य संस्थेकडे मोठ्या प्रमाणात निधी आला होता. सदर निर्णयाने विकास कामात अडथळा होणार असून याबाबत दाद मागणार.- अहेतेश्याम अली,नगराध्यक्ष, वरोरा