शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

जिल्ह्यात कुष्ठरोगाचे ३८५ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:22 IST

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे देशात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यात नमूद केले.

ठळक मुद्देजागृतीमुळे रूग्ण संख्येत घट : पोंभुर्णा, सिंदेवाही, मूल तालुक्यात सर्वाधिक रूग्णांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यात ३८२ नवीन कुष्ठरूग्ण मिळाल्याची माहिती पुढे आली. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे देशात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाल्याचेही त्यात नमूद केले.कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. मागील काही वर्षांपासून आरोग्य विभागाने कुष्ठरोग शोधमोहिम जोमाने सुरू केली होती. यावर्षीदेखील १४ दिवसांची कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात आली. यामध्ये १६ लाख ५५ हजार ३४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केल्या गेली. आशा स्वयंसेविका व पुरुष स्वयंसेवकाद्वारे ही मोहीम राबविण्यात आली. शहरी भागात २२५ तर ग्रामीण भागात १२३५ असे जिल्ह्यात एकूण १६० पथकाद्वारे शहरी भागातील एक लाख २८ हजार ९३३ व ग्रामीण भागातील १४ लाख पाच हजार ५३२ नागरिकांची तर महानगरपालिका क्षेत्रातील एक लाख २० हजार ९०२ अशा एकूण १६ लाख ५५ हजार ३४७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात पाच हजार २३० संशयित रूग्ण आढळून आले. या सर्व संशयित रूग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली होती. त्यातील ३८२ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कुष्ठरोगाचे सर्वात जास्त प्रमाण मूल, पोंभूर्णा, सिंदेवाही, सावली व ब्रह्मपुरी तालुक्यात आढळून आल्याचे सांगितले. याचे कारण म्हणजे या क्षेत्रात असलेले घनदाट जंगल, धानाची शेती, लोकात असणारी रोगप्रतिकार शक्तीची कमतरता व कुष्ठरोग जंतू निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण असणे यामुळे या भागात कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत आहे.कुष्ठरोग निर्मूलनाकरिता शासनाच्या आरोग्य विभागाद्वारा जनजागृतीवर जास्त भर दिला जात आहे. नागरिक जागरुक झाले आहे. लोक स्वत: दवाखान्यात येऊन कुष्ठरोगाचे उपचार करताना दिसतात. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नि:शुल्क तपासणी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.नियमित औषध व उपचाराने आजार नियंत्रणातकुष्ठरोगावर नियमितपणे औषधोपचाराने आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मागील दहा वर्र्षांत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. सहा ते बारा महिन्याच्या उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. शरीरावर पाच किंवा यापेक्षा कमी चट्ट्याचे व्रण असल्यास सहा महिन्यांचा उपचार दिला जातो तर यापेक्षा अधिक चट्टे असल्यास एक वर्ष औषधोपचार करणे अनिवार्य आहे.