शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

३८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार संगणक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:36 IST

जिल्ह्याने संगणक साक्षरतेकडे दमदार पाऊल टाकणे सुरु केले असून जिल्ह्यातील डिजिटल शाळांना आता टाटा ट्रस्टच्या मदतीने अद्यावत संगणक शिक्षणही मिळणार आहे....

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचा पुढाकार : प्रयोगशाळेला १ नोव्हेंबरपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याने संगणक साक्षरतेकडे दमदार पाऊल टाकणे सुरु केले असून जिल्ह्यातील डिजिटल शाळांना आता टाटा ट्रस्टच्या मदतीने अद्यावत संगणक शिक्षणही मिळणार आहे. जिल्ह्यात पाचवी ते दहावी पर्यंतच्या ९४२ शाळांमध्ये ३८ हजार ३०० विद्यार्थ्यांना पालकमंत्री संगणक प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात टाटा ट्रस्टसोबत केलेल्या करारानुसार बारामतीच्या प्रतिष्ठानतर्फे ही मोहीम जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला बळकटी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभ्यासिका निर्माण करणे सुरु आहे. दुसरीकडे नव्या काळाची गरज लक्षात घेता, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारित असलेल्या सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी अद्यावत डिजिटल क्लास निर्माण करण्यात येत आहे. ‘प्रगतीचा जनक, माझा संगणक’ या घोष वाक्याखाली आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मुलांना अद्यावत संगणक प्रशिक्षण मिळणार आहे.जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांची मोठी फळी यासाठी परिश्रम घेत असून या शिक्षकांचे प्रशिक्षण नियमित सुरु आहे. जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा खाजगी शाळांपेक्षाही दर्जेदार व आधुनिक बनविण्याचा पालकमंत्री मुनगंटीवार यांचा संकल्प असून त्यातूनच ५ आॅक्टोंबरला जिल्हाभरातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या साक्षीने टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्युट आॅफ इम्फॉरमेशन टेक्नॉलाजी तर्फे तंत्रस्नेही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ५ आॅक्टोंबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते या बसला जनसेवेसाठी कार्यान्वित केले असून प्रत्यक्ष १ नोव्हेंबरपासून याचा लाभ मिळणार आहे.पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांचा समावेशप्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे संगणक व प्रशिक्षक सामावून घेणाºया दहा अद्यावत बसेस जिल्ह्यामध्ये दाखल झाल्या असून १ नोव्हेंबरपासून पहिल्या ६ तालुक्यात सदर प्रशिक्षण सुरु होणार आहे. यामध्ये चंद्रपूर तालुक्यातील ८२ शाळा, बल्लारपूर, १६, जिवती ११, मूल २३, पोंभूर्णा १३ व गोंडपिपरी तालुक्.यातील २१ शाळांचा समावेश आहे. या शाळेतील ८ हजार ९९३ विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण मिळणार आहे. दुसºया टप्प्यामध्ये जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यांना लाभ मिळणार आहे.