शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी सजणार 342 वर्गखोल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST

शाळा परिसरत स्वच्छ, निटनेटका, इमारती चित्रयुक्त व शालेय माहितीने सुशोभित असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बोलक्या परिसरातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबच मूल्यशिक्षण आणि व्यवहार ज्ञानही मिळते. यातून त्यांची प्रगती तसेच ज्ञानात भर पडते. हा उद्देश समोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरु केले आहे.

ठळक मुद्देज्ञानकक्षा रुंदावणार : बाला पेंटींगच्या माध्यमातून होणार शाळांची रंगरंगोटी

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटामुळे मागील सव्वा वर्षापासून शाळा बंद आहे. परिणामी विद्यार्थी आता घरात रमले असून ते शाळा, अभ्यास यापासून बरेच दूर गेले आहे. दरम्यान आता चालू सत्रापासून शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळेत ते कंटाळू नये, शाळेबद्दल प्रमे वाटावे, शाळेत येण्याची आवड निर्माण व्हावी सोबतच त्यांच्या ज्ञानात भर पडून दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ३४२ वर्गखोल्यांची बाला पेंटींग अंतर्गत रंगरंगोटी करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. यासाठी जिल्ह्यातील ३४२ वर्गखोल्यांची निवड करण्यात आली असून यासाठी १ कोटी २ लाख ६० हजार रुपये खर्च केले जाणार आहे.शाळा परिसरत स्वच्छ, निटनेटका, इमारती चित्रयुक्त व शालेय माहितीने सुशोभित असतील तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. बोलक्या परिसरातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबच मूल्यशिक्षण आणि व्यवहार ज्ञानही मिळते. यातून त्यांची प्रगती तसेच ज्ञानात भर पडते. हा उद्देश समोर ठेवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले यांनी शाळांकडे विशेष लक्ष देणे सुरु केले आहे. या अंतर्गत त्यांनी वर्ग खोल्यांची बाला पेंटीग करून विद्यार्थ्यांच्या ज्ञान कक्षा रुंदावण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. या अंतर्गत सन २०१७-१८ पासून तर २०१९-२० पर्यंत ज्या गावांतील शाळांच्या वर्गखोल्या बांधण्यात आल्या आहेत. मात्र या खोल्यांना बाला पेंटींग अंतर्गत निधीची तरदूत नव्हती, अशा ३४२ वर्गखोल्यांची बाला पेंटींग अंतर्गत निवड करण्यात आली असून शैक्षणिकदृष्ट्या सज्ज करण्यासाठी १ कोटी २ लाख ६० हजार रुपये मंजुर केले आहे. या कामाला सुरुवातही झाली असून शैक्षणिक सत्र सुरु होतपर्यंत या वर्गखोल्या विद्यार्थ्यांच्या सज्ज होणार असून विद्यार्थ्यांना खुनावणार आहे. 

असा आहे उद्देश- शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे- आनंददायी शिक्षण- विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी- कल्पना शक्तीचा विकास- इयत्तेनुसार अध्यपन क्षमता विकास

१० वर्ष टिकेल अशी करावी लागणार गुणवत्तावर्गखोल्यांची पेंटिंग करताना किमान १० वर्ष टिकतील अशा प्रकारची गणवत्ता असणे गरजेचे असून यासाठी गुणवत्तेचे पेंट, ऑईल पेंट वापरून आतील आणि बाहेरील भागाची पेंटींग करावी लागणार आहे.

१ कोटी २ लाख ६० हजार होणार खर्चजिल्ह्यातील ३४२ वर्ग खोल्यांच्या पेंटीगसाठी १ कोटी २ लाख ४० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. या खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली असून पेंटींगचे कामही सुरु झाले आहे. दरम्यान, आणखी दोनशेच्या वर शाळांना पेंटीगसाठी निधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आह.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा