शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

३४ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. बुधवारपर्यंत दोन लाख ११ हजार २९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार १४० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ३९७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५९, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. 

ठळक मुद्दे१८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण : दिवसागणिक वाढू लागला संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १९ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर बुधवारी पुन्हा ३४ बाधितांची भर पडली. १८१ अ‍ॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहे. दिवसागणिक संसर्गाचा वेग वाढत असल्याने आरोग्य प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ४७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८९३ झाली. बुधवारपर्यंत दोन लाख ११ हजार २९४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८६ हजार १४० नमुने निगेटिव्ह आले. जिल्ह्यात ३९७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३५९, तेलंगणा व बुलडाणा प्रत्येकी एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक व वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या ३४ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १०, चंद्रपूर तालुका सात, बल्लारपूर एक, भद्रावती नऊ, मूल दोन, सावली एक, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर व वरोरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  कोरानाचे रुग्णात आता दुपटीने वाढ होणे सुरू झाले आहे. तरीही अनेकजण याबाबत याबाबत गंभीर दिसत नसल्याचे चित्र आहे.

मास्क न वापरणाऱ्यांकडून दहा लाखांचा दंड वसूल जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्क वापरणे, शारीरिक अंतराचे पालन करणे व गर्दी न करण्याबाबत नागरिकांना आवाहन केले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांवर नागरिकांवर प्रशासनाने कारवाई सुरू आहे. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ तीन दिवसात  एक हजार ३३७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियम न पाळणाऱ्या २० आस्थापनांवर ३९ हजारांचा दंड ठोठावला तर मास्क न वापरल्याने ४ हजार ६२५ जणांकडून ९ लाख ८६ हजार ५४० रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी दिली.

भद्रावतीत नऊ व्यावसायिकांकडून वसूल केला दंड भद्रावती : शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या टप्पा परिसरात नगरपरिषदेच्या भरारी पथकाने नऊ दुकानदारांवर कारवाई करून प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. नागरिक व दुकानदार शहरात बिनधास्तपणे वावरत असल्याने नगरपालिकेच्या भरारी पथकाने आपली धडक मोहीम राबविणे सुरू केले आहे. टप्पा परिसरात असलेल्या दुकानदाराकडे नागरिकांची गर्दी असल्याचे आढळून आल्याने व विना मास्क असलेल्या दुकानदारांवर प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसुली करून त्यांना ग्राहकांची गर्दी करण्यात येऊ नये व विना मास्क कोणालाही आतमध्ये प्रवेश देऊ नये, अशी ताकीद दिली. ही कारवाई मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, रवींद्र गड्डमवार, जगदीश गायकवाड व भरारी पथकाच्या सदस्यांनी केली.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या