शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST

पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजाराचे १९२ रुग्ण आढळून आले, अशी माहितीही संध्या गुरनुले यांनी दिली.

ठळक मुद्देसंध्या गुरनुले : साथीच्या रोगांची लागण, शेतीचे पूर्णता नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संजय सरोवरचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला आलेल्या पुराने ब्रह्मपुरीत कहर केला. पूरग्रस्त गावांच्या सर्व्हेक्षणातून विदारक वास्तव पुढे आले आहे. एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक प्रभावित झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजाराचे १९२ रुग्ण आढळून आले, अशी माहितीही संध्या गुरनुले यांनी दिली.पुरामुळे विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नव्हते. जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्फतीने ९७ विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. ज्यांची पूर्णता घरे कोसळली अशा १ हजार ३१८ नागरिकांना ब्रह्मपुरीतील विविध महाविद्यालयांमध्ये आसरा देण्यात आला आहे. कोविडची बाधा होऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचेही गुरनुले म्हणाल्या.यावेळी जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकार, महिला व बाल कल्याण सभापती नितु चौधरी यांच्यासह जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दशरथ सोमनाथे उपस्थित होते.४२ नळ पाणी पुरवठा योजना क्षतिग्रस्तपूरस्थितीमुळे नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली व चंद्रपूर या ५ तालुक्यातील ४२ नळ पाणी योजनांची गावे बाधित झाली. पैकी ३५ नळ पाणी पुरवठा योजना क्षतिग्रस्त झाल्या. यातील १९ योजना वीज पुरवठा खंडित व पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने बंद आहे. २३ योजनांची तात्पूरती डागडुजी करून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात ७२ हातपंपांचे फ्लशींग करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. क्षतिग्रस्त गावांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही जि.प. अध्यक्ष गुरनुले यांनी दिली.१३३ जनावरे वाहून गेलीपूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्यासाठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले आहे. पूरग्रस्त १३ गावातील ७७ पशुपालकांकडील १३३ जनावरे व ८ हजार ९८८ कुक्कुटपक्षांची हानी झाली आहे. यामध्ये १३ बैल, २४ गाइ, १२ म्हशी, १० रेडे, ९ वासरे व ६५ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या ९ गावांमध्ये ४२.९२ मेट्रीक टन चारा वाटप करण्यात आला आहे. २१ पूरग्रस्त गावांमध्ये शिबिरे आयोजित करून जनावरांवर लसीकरण व औषधोपचार करण्यात येत आहे.शेतीचे १०० टक्के नुकसानमहापुरामुळे शेती खरडून गेली. शेतीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी,कृषी सहाय्यकामार्फत सुरू आहे. १०० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. याकरिता शासनाने शेतकºयांना हेक्टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही गुरुनुले यांनी यावेळी केली.

टॅग्स :floodपूर