शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
2
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
3
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
4
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
5
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
6
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
7
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
8
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
9
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
10
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
11
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
14
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
15
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
16
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
17
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
18
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
19
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
20
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक पुरामुळे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST

पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजाराचे १९२ रुग्ण आढळून आले, अशी माहितीही संध्या गुरनुले यांनी दिली.

ठळक मुद्देसंध्या गुरनुले : साथीच्या रोगांची लागण, शेतीचे पूर्णता नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : संजय सरोवरचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला आलेल्या पुराने ब्रह्मपुरीत कहर केला. पूरग्रस्त गावांच्या सर्व्हेक्षणातून विदारक वास्तव पुढे आले आहे. एकट्या ब्रह्मपुरी तालुक्यातील ३२ हजार ३९५ नागरिक प्रभावित झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.पूर ओसरल्यानंतर या भागात डायरिया, मलेरिया, ग्रस्ट्रो, कावीळ, ताप, अतिसार यासारखे साथीचे आजावर बळावले असून या भागात जि.प. च्या आरोग्य विभागामार्फत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, १ लाख ११ हजार ९८१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजाराचे १९२ रुग्ण आढळून आले, अशी माहितीही संध्या गुरनुले यांनी दिली.पुरामुळे विहिरींचे पाणी पिण्यायोग्य नव्हते. जि.प. च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या मार्फतीने ९७ विहिरींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. ज्यांची पूर्णता घरे कोसळली अशा १ हजार ३१८ नागरिकांना ब्रह्मपुरीतील विविध महाविद्यालयांमध्ये आसरा देण्यात आला आहे. कोविडची बाधा होऊ नये, याची काळजी घेतली जात असल्याचेही गुरनुले म्हणाल्या.यावेळी जि.प. उपाध्यक्ष रेखा कारेकार, महिला व बाल कल्याण सभापती नितु चौधरी यांच्यासह जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दशरथ सोमनाथे उपस्थित होते.४२ नळ पाणी पुरवठा योजना क्षतिग्रस्तपूरस्थितीमुळे नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली व चंद्रपूर या ५ तालुक्यातील ४२ नळ पाणी योजनांची गावे बाधित झाली. पैकी ३५ नळ पाणी पुरवठा योजना क्षतिग्रस्त झाल्या. यातील १९ योजना वीज पुरवठा खंडित व पाईपलाईन नादुरुस्त झाल्याने बंद आहे. २३ योजनांची तात्पूरती डागडुजी करून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात ७२ हातपंपांचे फ्लशींग करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. क्षतिग्रस्त गावांचा पाणी पुरवठा पूर्ववत करण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे, अशी माहितीही जि.प. अध्यक्ष गुरनुले यांनी दिली.१३३ जनावरे वाहून गेलीपूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता व नागरिकांच्या आरोग्यासाठी २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश दिले आहे. पूरग्रस्त १३ गावातील ७७ पशुपालकांकडील १३३ जनावरे व ८ हजार ९८८ कुक्कुटपक्षांची हानी झाली आहे. यामध्ये १३ बैल, २४ गाइ, १२ म्हशी, १० रेडे, ९ वासरे व ६५ शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या ९ गावांमध्ये ४२.९२ मेट्रीक टन चारा वाटप करण्यात आला आहे. २१ पूरग्रस्त गावांमध्ये शिबिरे आयोजित करून जनावरांवर लसीकरण व औषधोपचार करण्यात येत आहे.शेतीचे १०० टक्के नुकसानमहापुरामुळे शेती खरडून गेली. शेतीचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी,कृषी सहाय्यकामार्फत सुरू आहे. १०० टक्के शेतीचे नुकसान झाले आहे. याकरिता शासनाने शेतकºयांना हेक्टरी १८ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही गुरुनुले यांनी यावेळी केली.

टॅग्स :floodपूर