शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

३१५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:26 IST

घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यात ३१५ शेतकरी कृषी विहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीच्या निविदा न निघाल्यामुळे ...

घनश्याम नवघडे

नागभीड : नागभीड तालुक्यात ३१५ शेतकरी कृषी विहिरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीच्या निविदा न निघाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याची माहिती आहे.

नागभीड तालुक्यात सिंचनाची कोणतीही सोय नाही. येथील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यातील शेतकरी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विहिरींच्या विविध योजनांचा लाभ घेत असून, या विहिरींच्या माध्यमातून शेतीला ओलीत करीत आहेत. २००० ते मार्च २०१८ पर्यंत या तालुक्यातील जवळपास २ हजार २०३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

मात्र, मार्च, २०१८ नंतर विद्युत मंडळाने वीज जोडण्या देण्याबाबत हात आखडते घेतले आहे. त्याऐवजी सौरऊर्जा संच देण्याकडे शासनाचा कल होता. मात्र, सौरऊर्जा संचास म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे परत वीज जोडणी देणे सुरू करण्यात आले. विश्वसनीय माहितीनुसार, जवाहर विहीर योजना, जीवनधारा विहीर योजना, महाराष्ट्र ग्रामीण विहीर योजना, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना या योजनांमधील विहिरीच्या ३९१ शेतकऱ्यांनी विहिरीचे काम पूर्ण करून विद्युत मंडळाकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले होते, अशी माहिती आहे. या ३९१ लाभार्थ्यांपैकी चालू वर्षात केवळ ७६ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली. उर्वरित निविदा निघाल्यानंतरच जोडणी मिळणार असल्याचे संकेत आहेत. आता या निविदा केव्हा निघतात, याकडे या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणाला आणि नापिकीला कंटाळून या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये. या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी मिळाली, तर ते आपल्या उत्पादनात निश्चितच भर घालू शकतात.