शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

नागभीड तालुक्यातील ३१५ शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:26 IST

नागभीड : तालुक्यात ३१५ शेतकरी कृषी विहिरींवर वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीच्या निविदा न निघाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याची ...

नागभीड : तालुक्यात ३१५ शेतकरी कृषी विहिरींवर वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. वीज जोडणीच्या निविदा न निघाल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याची माहिती आहे.

नागभीड तालुक्यात सिंचनाची कोणतीही सोय नाही. येथील शेतकरी पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहेत. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यातील शेतकरी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विहिरींच्या विविध योजनांचा लाभ घेत असून, या विहिरींच्या माध्यमातून शेतीला ओलीत करीत आहेत. २००० ते मार्च २०१८ पर्यंत या तालुक्यातील जवळपास २ हजार २०३ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

मात्र, मार्च २०१८ नंतर विद्युत मंडळाने वीज जोडण्या देण्याबाबत हात आखडता घेतला आहे. त्याऐवजी सौर ऊर्जा संच देण्याकडे शासनाचा कल होता. मात्र, सौर ऊर्जा संचास म्हणावा तेवढा प्रतिसाद न मिळाल्यामुळे परत वीज जोडणी देणे सुरू करण्यात आले. विश्वसनीय माहितीनुसार जवाहर विहीर योजना, जीवनधारा विहीर योजना, महाराष्ट्र ग्रामीण विहीर योजना, विशेष घटक योजना, आदिवासी उपयोजना या योजनांमधील विहिरीच्या ३९१ शेतकऱ्यांनी विहिरीचे काम पूर्ण करून विद्युत मंडळाकडे वीज जोडणीसाठी अर्ज केले होते, अशी माहिती आहे.

३९१ लाभार्थ्यांपैकी चालू वर्षात केवळ ७६ शेतकऱ्यांनाच वीज जोडणी देण्यात आली. उर्वरित निविदा निघाल्यानंतरच जोडणी मिळणार असल्याचे संकेत आहेत. आता या निविदा केव्हा निघतात याकडे या शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

निसर्गाच्या लहरीपणाचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी फटका बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणाला आणि नापिकीला कंटाळून या तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांवर ही वेळ येऊ नये. या शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी मिळाली तर ते आपल्या उत्पादनात निश्चितच भर घालू शकतात.