शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

३१ हजार ६५ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 28, 2017 00:33 IST

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून ...

जिल्हाभरात १२६ केंद्रांवर परीक्षा : सहा भरारी पथकांची राहणार नजर चंद्रपूर : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ७५ केंद्र ठेवण्यात आले आहेत. ३१ हजार ६५ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून गैरप्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची नजर राहणार आहे. बारावीची परीक्षा २५ मार्च पर्यंत चालणार असून ७ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यात १२६ केंद्र ठेवण्यात आले असून ३५ हजार २६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बारावी व पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रप्रमुख व परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर कॉपी चालत असल्याचा प्रकार दिसून येते. गतवर्षी अनेक कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले होते. बारावीच्या परीक्षेसाठी चंद्रपूर तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचे परीक्षा केंद्र अतिसंवेदनशिल घोषित करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सहा भरारी पथकेपरीक्षेत गैरप्रकार किंवा इतर कोणताही प्रकार घडू नये, यासाठी सहा भरारी पथक गठित करण्यात आले आहेत. यात शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षाधिकारी निरंतर शिक्षण विभाग, विशेष महिला पथक उपशिक्षाधिकारी माध्यमिक व प्राचार्य डायट यांच्या पथकाचा समावेश आहे. दहावीचे ३५ हजार विद्यार्थी ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचेही तयारी पूर्ण झाली आहे. १२६ केंद्रावरून ही परीक्षा पार पडणार आहे. यावर्षी ३५ हजार २६ नियमित तथा पुर्नपरीक्षार्थी दहावीची परीक्षा असून ही परीक्षा १ एप्रिलपर्यंत चालणार आहे. कॉपीबहाद्दरांनो सावधानबारावीच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी, गणित, विज्ञान अशा कठीण विषयाच्या पेपरला भरारी पथकांची केंद्रावर नजर असते. कॉपी करताना विद्यार्थी आढळल्यास त्याला निलंबीत केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी व निलंबीत होण्यापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. कलम १४४ लागूपरीक्षा काळात पोलीस विभागाची मदत घेण्यात येत असून परीक्षा केंद्राच्या १०० मीटर अंतर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात झेरॉक्स सेंटर, मोबाइल तथा अन्य साधने वापरण्यास बंदी आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कलम १४४ लागू राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.