शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

३१ हजार ६५ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

By admin | Updated: February 28, 2017 00:33 IST

उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून ...

जिल्हाभरात १२६ केंद्रांवर परीक्षा : सहा भरारी पथकांची राहणार नजर चंद्रपूर : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेला २८ फेब्रुवारी मंगळवारपासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी ७५ केंद्र ठेवण्यात आले आहेत. ३१ हजार ६५ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून गैरप्रकार रोखण्यासाठी सहा भरारी पथकांची नजर राहणार आहे. बारावीची परीक्षा २५ मार्च पर्यंत चालणार असून ७ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ होणार आहे. दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यात १२६ केंद्र ठेवण्यात आले असून ३५ हजार २६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार बारावी व पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षा शांततेत पार पडावी यासाठी परीक्षा केंद्रप्रमुख व परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आजही ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर कॉपी चालत असल्याचा प्रकार दिसून येते. गतवर्षी अनेक कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांना निलंबीत करण्यात आले होते. बारावीच्या परीक्षेसाठी चंद्रपूर तालुक्यातील सिद्धार्थ विद्यालयाचे परीक्षा केंद्र अतिसंवेदनशिल घोषित करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)सहा भरारी पथकेपरीक्षेत गैरप्रकार किंवा इतर कोणताही प्रकार घडू नये, यासाठी सहा भरारी पथक गठित करण्यात आले आहेत. यात शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षाधिकारी निरंतर शिक्षण विभाग, विशेष महिला पथक उपशिक्षाधिकारी माध्यमिक व प्राचार्य डायट यांच्या पथकाचा समावेश आहे. दहावीचे ३५ हजार विद्यार्थी ७ मार्चपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षेचेही तयारी पूर्ण झाली आहे. १२६ केंद्रावरून ही परीक्षा पार पडणार आहे. यावर्षी ३५ हजार २६ नियमित तथा पुर्नपरीक्षार्थी दहावीची परीक्षा असून ही परीक्षा १ एप्रिलपर्यंत चालणार आहे. कॉपीबहाद्दरांनो सावधानबारावीच्या परीक्षेदरम्यान इंग्रजी, गणित, विज्ञान अशा कठीण विषयाच्या पेपरला भरारी पथकांची केंद्रावर नजर असते. कॉपी करताना विद्यार्थी आढळल्यास त्याला निलंबीत केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा पार पाडावी व निलंबीत होण्यापासून स्वत:चा बचाव करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. कलम १४४ लागूपरीक्षा काळात पोलीस विभागाची मदत घेण्यात येत असून परीक्षा केंद्राच्या १०० मीटर अंतर परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात झेरॉक्स सेंटर, मोबाइल तथा अन्य साधने वापरण्यास बंदी आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कलम १४४ लागू राहणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.