शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

वाचन न करताच ३० विषय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:46 IST

सर्वसाधारण सभेत चालवायच्या विषयांची अंतिम सूची सभागृहात वाचन करून त्या त्या विषयाला मंजुरी दिली जाते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील प्रकार : विरोधकांची जोरदार निदर्शने

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सर्वसाधारण सभेत चालवायच्या विषयांची अंतिम सूची सभागृहात वाचन करून त्या त्या विषयाला मंजुरी दिली जाते. मात्र शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केवळ दोन विषयांचे वाचन करून ३० विषय वाचनाविनाच मंजूर करण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, कमी पटसंख्येमुळे बंद करण्यात आलेल्या ४५ शाळांमधील विद्यार्थी कुठे जाणार, पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, त्यांना गावातच शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात व सभागृहाबाहेर निदर्शने करून शासनाचा निषेध केला.सभेला सुरूवात झाली तेव्हा विषय सुचीवर ३० विषय होते. या विषयांवर सभागृहात चर्चा करून त्या विषयांना मंजुरी दिली जाते. मात्र विषय क्रमांक १ व २ चे वाचन करून अध्यक्षांनी स्वत:च विषयाला मंजूरी असल्याचे सभागृहात सांगितले. त्यामुळे काँग्रसचे गटनेता डॉ. सतीश वारजुकर यांनी अध्यक्ष कोणतीही चर्चा न करता विषय सुचीवरील विषय मंजुर करत असल्याचे पाहून रागात सर्वच विषय मंजूर करा, असे सुचविले. त्यामुळे अध्यक्षांनीही इतर विषयांचे वाचन थांबवून सर्वच विषय मंजूर असे सभागृहात सांगितले. मात्र यावर सभागृहातल्या एकाही सदस्याने आक्षेप घेतला नाही. विषय सुचीवर महत्त्वाचे विषय असतानाही एकाही सदस्याने विरोध न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी शासनाकडून सव्वा चार कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तर ‘मी सभापती बोलतोय’ या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील सरपंचांना थेट सभापतींशी संवाद साधून समस्या मांडता येत असल्याने जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे व समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला मंजूरी देण्यात आली. मात्र याचवेळी २५/१५ चा २५ कोटींचा निधी व मूल पंचायत समिती इमारत बांधकामासाठी मिळालेला ८ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते केल्याने याबाबतही अभिनंदन ठराव मंजूर करण्याची मागणी वारजूकर यांनी केली. मात्र सभागृहाने ही मागणी फेटाळून लावली. वसंत भवनात गेल्या कित्येक वर्षांपासून बस्तान मांडून असलेल्या व्यवसायिकांवर कार्यवाही करण्यात जिल्हा परिषद दिरंगाई करीत असल्याचा विषयही सभेत चांगलाच वादळी ठरला. मात्र या विषयावर कोणताही ठोस निर्णय होवू शकला नाही. नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना जिल्हा परिषदेने मदत करण्याची मागणी आसावरी देवतळे यांनी केली. संजय गजपुरे यांनी वसंत भवन, मामा तलावातील अतिक्रमण व जिल्ह्यातील सरपंच व सदस्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न उपस्थित केला.विरोधकांच्या प्रश्नांना बगलसभागृहात काँग्रेसचे गटनेता सतीश वारजूकर यांनी १६ तर सत्ताधारी गटाचे संजय गजपुरे यांनी तीन विषय मांडले. गजपुरे यांच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र आपले विषय महत्त्वाचे असतानाही अध्यक्षांनी बगल देत चर्चा होवू दिली नाही, असा आरोप गटनेता वारजूकर यांनी केला आहे. ग्रामीण भागातील महत्त्वाच्या समस्यांवर सभागृहात चर्चा होत नाही. आणि झालीच तर केवळ मोघम उत्तरे दिली जातात, असे वारजूकर यांनी म्हटले आहे.विषय सुचीवरील सर्व विषयांवर चर्चा झाली. विरोधकांनी होकार दिल्यानंतरच विषयांना मंजुरी देण्यात आली. कुणाच्याही प्रश्नांना बगल दिली नाही.- देवराव भोंगळे, जि. प. अध्यक्ष, चंद्रपृूर.