शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वाचन न करताच ३० विषय मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 23:46 IST

सर्वसाधारण सभेत चालवायच्या विषयांची अंतिम सूची सभागृहात वाचन करून त्या त्या विषयाला मंजुरी दिली जाते.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील प्रकार : विरोधकांची जोरदार निदर्शने

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सर्वसाधारण सभेत चालवायच्या विषयांची अंतिम सूची सभागृहात वाचन करून त्या त्या विषयाला मंजुरी दिली जाते. मात्र शुक्रवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केवळ दोन विषयांचे वाचन करून ३० विषय वाचनाविनाच मंजूर करण्यात आल्याचा प्रकार घडला. दरम्यान, कमी पटसंख्येमुळे बंद करण्यात आलेल्या ४५ शाळांमधील विद्यार्थी कुठे जाणार, पहिले ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय थांबवा, त्यांना गावातच शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्या, या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहात व सभागृहाबाहेर निदर्शने करून शासनाचा निषेध केला.सभेला सुरूवात झाली तेव्हा विषय सुचीवर ३० विषय होते. या विषयांवर सभागृहात चर्चा करून त्या विषयांना मंजुरी दिली जाते. मात्र विषय क्रमांक १ व २ चे वाचन करून अध्यक्षांनी स्वत:च विषयाला मंजूरी असल्याचे सभागृहात सांगितले. त्यामुळे काँग्रसचे गटनेता डॉ. सतीश वारजुकर यांनी अध्यक्ष कोणतीही चर्चा न करता विषय सुचीवरील विषय मंजुर करत असल्याचे पाहून रागात सर्वच विषय मंजूर करा, असे सुचविले. त्यामुळे अध्यक्षांनीही इतर विषयांचे वाचन थांबवून सर्वच विषय मंजूर असे सभागृहात सांगितले. मात्र यावर सभागृहातल्या एकाही सदस्याने आक्षेप घेतला नाही. विषय सुचीवर महत्त्वाचे विषय असतानाही एकाही सदस्याने विरोध न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांसाठी शासनाकडून सव्वा चार कोटी रूपयांचा निधी मिळाला आहे. तर ‘मी सभापती बोलतोय’ या उपक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील सरपंचांना थेट सभापतींशी संवाद साधून समस्या मांडता येत असल्याने जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे व समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या ठरावाला मंजूरी देण्यात आली. मात्र याचवेळी २५/१५ चा २५ कोटींचा निधी व मूल पंचायत समिती इमारत बांधकामासाठी मिळालेला ८ कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळते केल्याने याबाबतही अभिनंदन ठराव मंजूर करण्याची मागणी वारजूकर यांनी केली. मात्र सभागृहाने ही मागणी फेटाळून लावली. वसंत भवनात गेल्या कित्येक वर्षांपासून बस्तान मांडून असलेल्या व्यवसायिकांवर कार्यवाही करण्यात जिल्हा परिषद दिरंगाई करीत असल्याचा विषयही सभेत चांगलाच वादळी ठरला. मात्र या विषयावर कोणताही ठोस निर्णय होवू शकला नाही. नुकसानग्रस्त कापूस उत्पादकांना जिल्हा परिषदेने मदत करण्याची मागणी आसावरी देवतळे यांनी केली. संजय गजपुरे यांनी वसंत भवन, मामा तलावातील अतिक्रमण व जिल्ह्यातील सरपंच व सदस्यांच्या थकीत मानधनाचा प्रश्न उपस्थित केला.विरोधकांच्या प्रश्नांना बगलसभागृहात काँग्रेसचे गटनेता सतीश वारजूकर यांनी १६ तर सत्ताधारी गटाचे संजय गजपुरे यांनी तीन विषय मांडले. गजपुरे यांच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र आपले विषय महत्त्वाचे असतानाही अध्यक्षांनी बगल देत चर्चा होवू दिली नाही, असा आरोप गटनेता वारजूकर यांनी केला आहे. ग्रामीण भागातील महत्त्वाच्या समस्यांवर सभागृहात चर्चा होत नाही. आणि झालीच तर केवळ मोघम उत्तरे दिली जातात, असे वारजूकर यांनी म्हटले आहे.विषय सुचीवरील सर्व विषयांवर चर्चा झाली. विरोधकांनी होकार दिल्यानंतरच विषयांना मंजुरी देण्यात आली. कुणाच्याही प्रश्नांना बगल दिली नाही.- देवराव भोंगळे, जि. प. अध्यक्ष, चंद्रपृूर.