शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कंत्राटदाराला ३० लाखांचा दंड

By admin | Updated: June 6, 2017 00:38 IST

गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही.

गडचांदूर येथील योजना : चार वर्षांपासून जलशुद्धीकरणाचे काम रेंगाळलेलोकमत न्यूज नेटवर्कवनसडी : गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवानी लागत आहे. याची दखल घेत चार वर्षे लोटूनही काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारावर ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.गडचांदूर शहराला सिमेंटनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत होती. याची दखल घेत येथे फिल्टर प्लांट आणि पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडे हे काम सोपविण्यात आले. जीव प्राधिकरणाने निविदा प्रकाशित केली. कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे काम सोपविण्यात आले. मागील चार वर्षापासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र काम संथगतीने सुरू आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची हमी कंत्राटदाराने दिली होती. मात्र, मुदतीत काम झाले नाही. त्यामुळेच आता कंत्राटदारावर दररोज चार हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत ३० लाखांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आल्याचे जीवन प्राधीकरण विभागाकडून सांगण्यात आले. या कामाबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दोन महिन्यातच काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षीही हेच उत्तर त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले होते. वास्तविक, फिल्टर प्लांट, टाकी आणि पाइप फिटींगची अनेक कामे व्हायची आहेत. शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती.