शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराला ३० लाखांचा दंड

By admin | Updated: June 6, 2017 00:38 IST

गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही.

गडचांदूर येथील योजना : चार वर्षांपासून जलशुद्धीकरणाचे काम रेंगाळलेलोकमत न्यूज नेटवर्कवनसडी : गडचांदूर शहरात फिल्टर प्लँट, मोठी टाकीला मंजुरी मिळाली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र चार वर्षे लोटूनही काम पूर्णत्वास आले नाही. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिऊन तहान भागवानी लागत आहे. याची दखल घेत चार वर्षे लोटूनही काम अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारावर ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.गडचांदूर शहराला सिमेंटनगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे पाण्याची समस्या नेहमीच उद्भवत असते. उन्हाळ्याच्या दिवसात तर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत होती. याची दखल घेत येथे फिल्टर प्लांट आणि पाण्याची टाकी मंजूर करण्यात आली. यासाठी नऊ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाकडे हे काम सोपविण्यात आले. जीव प्राधिकरणाने निविदा प्रकाशित केली. कमी दर असलेल्या कंत्राटदाराला हे काम सोपविण्यात आले. मागील चार वर्षापासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र काम संथगतीने सुरू आहे. दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याची हमी कंत्राटदाराने दिली होती. मात्र, मुदतीत काम झाले नाही. त्यामुळेच आता कंत्राटदारावर दररोज चार हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. आतापर्यंत ३० लाखांचा दंड कंत्राटदाराकडून वसूल करण्यात आल्याचे जीवन प्राधीकरण विभागाकडून सांगण्यात आले. या कामाबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, दोन महिन्यातच काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षीही हेच उत्तर त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाले होते. वास्तविक, फिल्टर प्लांट, टाकी आणि पाइप फिटींगची अनेक कामे व्हायची आहेत. शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती.