शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

शारीरिक चाचणीत ३० उमेदवार अपात्र

By admin | Updated: April 9, 2017 00:54 IST

पोलीस भरती प्रक्रियेच्या १३व्या दिवशी ३३८ उमेदवारांना बोलावण्यात आले.

पोलीस भरतीचा १३ वा दिवस : ३३८ उमेदवार मोजमाप व चाचणीसाठी पाचारणचंद्रपूर : पोलीस भरती प्रक्रियेच्या १३व्या दिवशी ३३८ उमेदवारांना बोलावण्यात आले. त्यापैकी आलेल्या २२२ उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यातून ३० उमेदवार पात्र ठरले आहेत.जिल्हा पोलीस विभागात गेल्या १३ दिवसांपासून भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. १३ व्या दिवशी १९२ उमेदवार मैदानी चाचणीला सामोरे गेले. शिपाई पदाकरिता भरती प्रक्रियेचीसुरुवात २२ मार्चपासून पोलीस मुख्यालयात सुरू आली आहे. एकूण ७२ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५ हजार ९६२ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केलेले होते. यापैकी ३ हजार ४२२ महिला उमेदवार तर १२ हजार ५४० हे पुरुष उमेदवारांचा समावेश होता. आधी शारीरिक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरुप आहे.शारिरीक मोजमाप प्रक्रियेत दररोज उमेदवारांना पाचारण करण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत: गुणवत्तेवर आधारीत असून अत्यंत पारदर्शकपणे तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस भरतीच्या नावावर आमिष देण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या प्रलोभणास बळी पडू नयेतसेच असे प्रलोभन कोणी देत असल्यास त्याची तत्काळ माहिती पोलीस विभागास द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी केले आहे. (प्रतिनिधी) भरतीप्रक्रियेवर ४० कॅमेऱ्यांची नजरपोलीस भरतीप्रक्रियेवर नजर ठेवण्याकरिता ४० कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याकरिता ४० पोलीस व्हिडिओग्राफरना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांमध्ये शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचा प्रत्येक्ष टिपण्यात येत आहे. याशिवाय मैदानावरही काही छुपे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्या कॅमेऱ्यांद्वारे मैदानातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.गुप्तवार्ता विभाग सक्रीयपोलीस भरतीमध्ये उमेदवारांना गाठून काही प्रलोभणे दिली जातात. या असामाजिक तत्त्वांवर लक्ष ठेवण्याकरिता आणि त्याला पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राज्य गुप्तवार्ता विभागाला गुप्त माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ नये, याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. उमेदवारांच्या बोटाचे ठसेभरतिप्रक्रियेत प्रथमच उमेदवारांच्या बोटाचे ठसे घेण्यात येत आहेत. उमेदवार शारीरिक चाचणीसाठी उपस्थित झाल्यावर आणि लेखी परीक्षेसाठी आल्यावर पुन्हा बोटाचे ठसे घेतले जातील. त्यामुळे एकच उमेदवार शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उपस्थित राहण्याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय उमेदवाराला काही आक्षेप असल्यास मैदानावरच तत्काळ अपील करण्याची सोय करण्यात आली आहे.