शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक चाचणीत ३० उमेदवार अपात्र

By admin | Updated: April 9, 2017 00:54 IST

पोलीस भरती प्रक्रियेच्या १३व्या दिवशी ३३८ उमेदवारांना बोलावण्यात आले.

पोलीस भरतीचा १३ वा दिवस : ३३८ उमेदवार मोजमाप व चाचणीसाठी पाचारणचंद्रपूर : पोलीस भरती प्रक्रियेच्या १३व्या दिवशी ३३८ उमेदवारांना बोलावण्यात आले. त्यापैकी आलेल्या २२२ उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यातून ३० उमेदवार पात्र ठरले आहेत.जिल्हा पोलीस विभागात गेल्या १३ दिवसांपासून भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. १३ व्या दिवशी १९२ उमेदवार मैदानी चाचणीला सामोरे गेले. शिपाई पदाकरिता भरती प्रक्रियेचीसुरुवात २२ मार्चपासून पोलीस मुख्यालयात सुरू आली आहे. एकूण ७२ जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार एकूण १५ हजार ९६२ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केलेले होते. यापैकी ३ हजार ४२२ महिला उमेदवार तर १२ हजार ५४० हे पुरुष उमेदवारांचा समावेश होता. आधी शारीरिक मोजमाप त्यानंतर मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी चाचणी असे या भरती प्रक्रियेचे स्वरुप आहे.शारिरीक मोजमाप प्रक्रियेत दररोज उमेदवारांना पाचारण करण्यात येत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णत: गुणवत्तेवर आधारीत असून अत्यंत पारदर्शकपणे तिची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस भरतीच्या नावावर आमिष देण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्या प्रलोभणास बळी पडू नयेतसेच असे प्रलोभन कोणी देत असल्यास त्याची तत्काळ माहिती पोलीस विभागास द्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवान यांनी केले आहे. (प्रतिनिधी) भरतीप्रक्रियेवर ४० कॅमेऱ्यांची नजरपोलीस भरतीप्रक्रियेवर नजर ठेवण्याकरिता ४० कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याकरिता ४० पोलीस व्हिडिओग्राफरना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांमध्ये शारीरिक मोजमाप, मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचा प्रत्येक्ष टिपण्यात येत आहे. याशिवाय मैदानावरही काही छुपे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्या कॅमेऱ्यांद्वारे मैदानातील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना पोलीस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.गुप्तवार्ता विभाग सक्रीयपोलीस भरतीमध्ये उमेदवारांना गाठून काही प्रलोभणे दिली जातात. या असामाजिक तत्त्वांवर लक्ष ठेवण्याकरिता आणि त्याला पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी राज्य गुप्तवार्ता विभागाला गुप्त माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भरतीमध्ये कोणताही भ्रष्टाचार होऊ नये, याकरिता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. उमेदवारांच्या बोटाचे ठसेभरतिप्रक्रियेत प्रथमच उमेदवारांच्या बोटाचे ठसे घेण्यात येत आहेत. उमेदवार शारीरिक चाचणीसाठी उपस्थित झाल्यावर आणि लेखी परीक्षेसाठी आल्यावर पुन्हा बोटाचे ठसे घेतले जातील. त्यामुळे एकच उमेदवार शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये उपस्थित राहण्याची दक्षता घेण्यात आली आहे. याशिवाय उमेदवाराला काही आक्षेप असल्यास मैदानावरच तत्काळ अपील करण्याची सोय करण्यात आली आहे.